घरCORONA UPDATEकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयात शिवभोजन - छगन भुजबळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयात शिवभोजन – छगन भुजबळ

Subscribe

राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण

राज्याचे अन्न, नागरीपुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी फेसबुकच्या माध्यममातून संवाद साधला. यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. राज्यातील गरजु,गोरगरीब,शेतकरी,कामगार व
मजूर वर्गाला मोठा दिलासा मिळेल अशा घोषणा केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर आणि विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयात शिवभोजन देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचा अन्न, नागरी पुरवठा विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.


हेही वाचा – Coronavirus: क्वारंटाईन व्यक्तीने घेतला महिलेचा चावा; महिलेचा मृत्यू

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला असून आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. दरम्यान, वेळेत वाढ केली असून आता ११ ते ३ या वेळेत हे भोजन दिले जाणार आहे. रोज १ लाख लोकांना शिवभोजन दिले जाणार आहे. शिवभोजन थाळीच्या ५ पट भोजन थाळ्या वाढवून दिलेल्या आहेत. राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर आणि विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी थाळीचा किंमत १० ऐवजी फक्त ५ रुपयात दिली जाणार आहे. ३ महिन्यांकरता ही सवलत असणार आहे. पॅकेजिंगच्या स्वरूपात देखील व्यवस्था केली जाणआर आहे. शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन देणार आहे. यासाठी शासनाने १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेची खबरदारी म्हणून सगळी भांडी निर्जंतुक करणे, कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हात धुवून मग थाळी दिली जाणार आहे.

यांना घेता येणार लाभ 

या निर्णयानुसार कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जे लोक स्वतःच्या जेवणाची सोय करू शकत नाही त्यांना शिव भोजनाचा लाभ घेण्यासाठी व्यापक प्रसिद्धी देण्यात येऊन यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय तसेच पोलिस यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावरील बेघर,स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी उपाशी राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. शिवभोजन चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देणे तसेच भोजनालय दररोज निर्जंतुक करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.भोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्यतो पॅकिंग स्वरूपात जेवण उपलब्ध करून देणे,जेवण तयार करण्याआधी हात कमीत कमी वीस सेकंद साबणाने स्वच्छ करणे, शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतुक करून घेणे,भोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे, भोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे त्याचबरोबर भोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीतकमी तीन फूट अंतर राहील याची दक्षता घ्यावी अशा सूचना करण्यात आलेल्या आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन मिळणार असल्याने राज्यातील गरजु,गोरगरीब,शेतकरी,कामगार व मजूर वर्गाला शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत २४ तासांत मदत कार्य 

कोरोना आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागरीकांना रेशन दुकानावर साहित्य न मिळणे,बाजारात वाढीव दराने वस्तूंची विक्री होणे तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत राज्यभरातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे  मा.मंत्री कार्यालयामार्फत तात्काळ निरसन केले जात आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत तसेच इतर कोणत्याही स्वरुपाच्या समस्या भेडसावत असल्यास नागरीकांना सहाय्य मिळवून देण्यासाठी  मंत्री महोदय यांचे कार्यालय सदैव तत्पर असून तक्रारदारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे मंत्री कार्यालयाचे आवाहन आहे.

अन्न धान्यासाठी गोदाम अपूर्ण नाही. खाद्य तेलांच्या बाबत प्रश्न मार्गी लावलेला आहे. तेलाची कमतरता भासणार नाही अशी काळजी घेतो आहोत. तेलाच्या कालाबाजर प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे छगन भुजबळ म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -