राज्याचे अन्न, नागरीपुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी फेसबुकच्या माध्यममातून संवाद साधला. यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. राज्यातील गरजु,गोरगरीब,शेतकरी,कामगार व
मजूर वर्गाला मोठा दिलासा मिळेल अशा घोषणा केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर आणि विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयात शिवभोजन देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचा अन्न, नागरी पुरवठा विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – Coronavirus: क्वारंटाईन व्यक्तीने घेतला महिलेचा चावा; महिलेचा मृत्यू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला असून आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. दरम्यान, वेळेत वाढ केली असून आता ११ ते ३ या वेळेत हे भोजन दिले जाणार आहे. रोज १ लाख लोकांना शिवभोजन दिले जाणार आहे. शिवभोजन थाळीच्या ५ पट भोजन थाळ्या वाढवून दिलेल्या आहेत. राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर आणि विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी थाळीचा किंमत १० ऐवजी फक्त ५ रुपयात दिली जाणार आहे. ३ महिन्यांकरता ही सवलत असणार आहे. पॅकेजिंगच्या स्वरूपात देखील व्यवस्था केली जाणआर आहे. शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन देणार आहे. यासाठी शासनाने १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेची खबरदारी म्हणून सगळी भांडी निर्जंतुक करणे, कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हात धुवून मग थाळी दिली जाणार आहे.
यांना घेता येणार लाभ
जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत २४ तासांत मदत कार्य
अन्न धान्यासाठी गोदाम अपूर्ण नाही. खाद्य तेलांच्या बाबत प्रश्न मार्गी लावलेला आहे. तेलाची कमतरता भासणार नाही अशी काळजी घेतो आहोत. तेलाच्या कालाबाजर प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे छगन भुजबळ म्हणाले.