घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात निवडणुकांची रणधुमाळी, 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

महाराष्ट्रात निवडणुकांची रणधुमाळी, 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

Subscribe

राज्यातील 340 तालुक्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी येत्या १८.डिसेंबरला मतदान होणार अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपसह राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे आणि शिवसेनेचे ठाकरे-शिंदे गट चांगलेच तयारीला लागले आहे. या निवडणुका आता सत्ताधारी भाजप, शिंदे गटासाठी प्रतिष्ठेच्या ठरत आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहे. यातच आता राज्यातील विविध 340 तालुक्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 18 डिसेंबरला मतदान होणार असून 20 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबरलाच मतदान होईल. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज दिली आहे.

- Advertisement -

मदान यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल.

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.

- Advertisement -

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या:

अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.


हेही वाचा : दिल्लीसह देशातील ‘या’ राज्यांत ‘अमूल बटर’चा तुटवडा; सोशल मीडियावर तक्रारींचा पूर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -