आदित्य ठाकरेंवर आमचा मुळीच बोलण्याचा अधिकार नाही. कारण आम्हाला बाळासाहेबांनी आणि उद्धव ठाकरेंनी मोठं केलं आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कोण आहेत?, तुम्ही गद्दार आहात असं बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे. 32 वर्षांचा पोरगा आमच्यावर टीका करतोय. तेव्हा आदित्य ठाकरे गोधडीत नव्हते तेव्हा मी शिवसेनेत होतो, असा हल्लाबोल शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
शिवसेनेतून बाहेर पडल्यावर काही लोक म्हणतात की, तेरा क्या होगा कालिया? मात्र आमचा गब्बर आहे, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना उत्तर दिलं.
तुम्ही इस्टेटचे वारसदार होऊ शकतात. परंतु विचारांचे वारसदार होऊ शकत नाही. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसदार हा गुलाबराव पाटील आहे. मी गुवाहाटीला गेलो होतो. तेव्हा पत्नी मुलांचे फोन आले. परत या म्हटले. आता परत येत नाही असे म्हणत ही संघर्षाची कहाणी असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.