घरताज्या घडामोडी'हर घर तिरंगा' अभियान; पालिकेतर्फे आजपासून झेंड्यांचे मोफत वाटप

‘हर घर तिरंगा’ अभियान; पालिकेतर्फे आजपासून झेंड्यांचे मोफत वाटप

Subscribe

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मुंबईत १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाच्या अंतर्गत झोपडपट्टीतील चाळीत, वसाहती, मध्यम वर्गीय सोसायटी, उंच इमारती, पालिका, खासगी व सरकारी कार्यालये आदी ठिकाणी भारतीय तिरंगा डौलाने फडकविण्यासाठी पालिकेतर्फे ५० लाख झेंड्यांचे मोफत वाटप मंगळवारपासून करण्यात येणार आहे.

यासंदर्भातील माहिती पालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी विविध क्षेत्रांमधील सामाजिक संस्थां, स्वयंसहाय्यता गट, बचत गट, स्वयंसेवक यांचे योगदान घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र शासनाच्या वतीने ‘आझादी का अमृत महोत्सव’ राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशभरात १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जाणार आहे. पालिका ७ कोटींचा खर्च करून मोफत झेंडे वाटप करणार आहे.

त्याचप्रमाणे १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान मरीन ड्राईव्ह येथे ‘लेझर शो’ देखील होणार आहे. या कालावधीत प्रत्येकाने आपल्या निवासस्थानाच्या गॅलरीत ,खिडकीत, दरवाजावर हा झेंडा लावायचा आहे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ठाकरी भाषा फक्त शिवसेनाप्रमुखांनाच शोभते, शहाजीबापू पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -