घरताज्या घडामोडीआरोग्यमंत्र्यांचे रुग्णालयातून विद्यार्थ्यांना भावनिक पत्र; म्हणाले...'मला मदत करा'

आरोग्यमंत्र्यांचे रुग्णालयातून विद्यार्थ्यांना भावनिक पत्र; म्हणाले…’मला मदत करा’

Subscribe

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातून विद्यार्थ्यांना लिहिले भावनिक पत्र.

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकेवर काढले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व यंत्रणा पुन्हा एकदा जोमाने कामाला लागली आहे. काही ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर बऱ्याच ठिकाणी नियमांचे पालन करा. मास्क लावा. सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सूचनांचे पालन करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांकडून वारंवार केले जात आहेत. तसेच मुंबईच्या महापौर देखील रस्त्यावर उतरुन नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन करत आहेत. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील रुग्णालयातून विद्यार्थ्यांना भावनिक पत्राद्वारे कळकळीचे आवाहन केले आहे. तसेच कोरोनाविरोधातील लढाई लढण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांकडे मदतीची मागणी देखील केली आहे.

अखेर कोरोनाने गाठले

२०२०च्या मार्च महिन्यात कोरोनाने राज्यात शिरकाव केला. त्यानंतर आरोग्य प्रशासनासह महापालिका प्रशासन सज्ज झाले. या दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील दररोज राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा आढाव घेत होते. त्या दरम्यान, त्यांच्या आईची तब्येत देखील खालावली होती. मात्र, आईची सेवा करुन ते नागरिकांसाठी अहोरात्र मेहनत घेत असल्याचे पाहिले आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या आईच्या अंत्यसंस्कारानंतर देखील त्यादिवशी आपल्या कामाचा धडाका चालू ठेवला. अक्षरश: पायाला भिंगरी लागल्यासारखे ते काम करत होते. मात्र, त्यांना त्यावेळी कोरोनाचीबाधा झाली नाही. पण, आता डोकवर काढलेल्या कोरोनाने त्यांना गाठले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाचीबाधा झाली असून सध्या ते उपचार घेत आहेत. मात्र, रुग्णालयातून देखील त्यांनी कोरोनाविरोधात लढाई लढाची आहे, असे आवाहन महाराष्ट्र जनतेला केले आहे.

- Advertisement -

काय आहे आरोग्यमंत्र्यांच भावनिक पत्र?

‘प्रिय विद्यार्थी मित्रांनो, शाळा, महाविद्यालये नुकतेच सुरु झाले आणि कोरोना नुकताच वाढताना दिसतोय. कोरोना विरुद्ध लढाई गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. तुमच्या सर्वांच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मदतीने ही लढाई आपण नक्कीच जिंकणार यात शंका नाही. तुमच खेळण्याचं, बागडण्याच हे वय क्रिडागंणावर घाम गाळण्याच हे वय. परंतु, गेले वर्षभर तुम्हाला घरातच बसाव लागल कोरोनावर मात करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. ती अशी की, प्रथम तुम्ही तुमचीच काळजी घ्या. त्याचबरोबर आपल्या आई-वडिलांची, भाऊ-बहिणीची आणि शेजार्‍यांची ही काळजी घ्या. आई-वडिलांना कामानिमित्त बाहेर जाव लागत. बाहेरुन आल्यावर त्यांनी हात-पाय स्वच्छ धुतलेत का नाही ते पहा. त्यांनी बाहेर जाताना मास्क लावला का नाही ते पहा. सॅनिटाझर वापरल का नाही ते देखील पहा. शासनाने ठरवून दिलेले नियम पाळले जातात का नाही ते पहा. जर कदाचित कोरोनाचे काही लक्षण दिसलेच तर लगेच सरकारी दवाखान्यात त्यांना घेऊन जा. त्यांची काळजी घेण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. मित्रांनो, आजचा विद्यार्थी आणि तरुण देशाचा उद्याचा आधारस्तंभ आहे. तरुणाच शरीर सुदृढ, मन सकारात्मक आणि बुद्धी सतेज पाहिजे तरच त्याला योग्य वेळी, योग्य निर्णय घेता येतात. तेव्हाच तो जीवनात यशस्वी होतो. तर मग चला मला करणार ना मदत. मला तुमची खात्री आहे. आपण ही लढाई नक्कीच जिंकणार!’


हेही वाचा – शरद पवारांच्या नाराजीवर संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -