घरमहाराष्ट्रयंदाची वारी निर्बंधामुक्त होईल, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

यंदाची वारी निर्बंधामुक्त होईल, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Subscribe

मास्कचा वापर अद्याप सक्तीचा केलेला नाही. दंडही आकारण्यात येणार नाही. पण सर्वांना मास्क वापरण्याचे आवाहन आम्ही केले आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.

राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण (coronavirus patient) वाढत आहेत. आता तर जुलै महिन्यात आषाढी एकादशी आहे. वारीमध्ये १० ते १५ लाख वारकरी सहभागी होतात. कोरोनाचे संकट असले तरी काळजी घेऊन दिंडी पूर्ण करावी असा तत्वतः निर्णय  झाला आहे. त्यामुळे यंदाची वारी होईल त्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी स्पष्ट केले (rajesh tope said that ashadhi wari will be free from restrictions). राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी कोविड सादरीकरणही झाले. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना वरील माहिती दिली.

तीन ते आठ टक्के पाॅझिटिव्ही दर

- Advertisement -

राज्यात मुंबई (mumbai) शहर, उपनगर, ठाणे (thane), पालघर (palghar), रायगड (raigad) आणि पुणे (pune) या सहा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या जिल्ह्यात तीन ते आठ टक्के पाॅझिटिव्ही दर आहे. चाचण्यांमध्ये रुग्ण पाॅझिटिव्ह आढळत असले तरी रुग्णालयात दाखल होणा-या रुग्णांचे प्रमाण चार टक्के आहे. यामध्ये गंभीर रुग्णांची संख्या नाही. त्यामुळे काळजीचे कारण नाही. पण या सहा जिल्ह्यात कोरोना चाचण्या कठोरपणे वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकारनेही दिल्या आहेत, असे टोपे यांनी सांगितले.

नेत्यांना कोरोनाची लागण

- Advertisement -

जुलै महिन्यातील आषाढी एकादशीच्या वारीबद्दल माहिती देताना टोपे म्हणाले की, आता वारीची तयारी पुढे गेली आहे.  वारीमध्ये लाखो वारकरी एकत्र येतात. त्यामुळे काळजी घेऊन वारी पूर्ण करावी लागेल अशी चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली. यंदाची वारी होईल त्यात कोणतीही अडचण येणार नाही. चित्रपट निर्माता- दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीत सहभागी झालेले अनेक सेलेब्रिटी कोरोना पाॅझिटिव्ह झाले आहेत. या पार्टीत सहभागी झालेल्यांना कोरोनाच्या बीए ४ आणि बीए ५ या व्हेरीयंटचा संसर्ग झाला. राजकीय क्षेत्रातील नेतेही कोरोना पाॅझिटिव्ह होत आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही ताप येत आहे. त्यांच्या चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही, असे टोपे  म्हणाले.

बूस्टर डोसचे आवाहन

मास्कचा वापर अद्याप सक्तीचा केलेला नाही. दंडही आकारण्यात येणार नाही. पण सर्वांना मास्क वापरण्याचे आवाहन आम्ही केले आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली. लसीचे दोन डोस घेतलेल्यांनी बूस्टर डोस घ्यावा. दुसरा डोस घेतल्यावर नऊ महिने झाले असतील तर त्यांनी बूस्टर डोस घ्यावा. स्वतःची आणि समाजाची काळजी घेण्यासाठी बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -