घरमहाराष्ट्रराज्यात उष्णतेच्या लाटेसह वादळी पाऊस पडणार

राज्यात उष्णतेच्या लाटेसह वादळी पाऊस पडणार

Subscribe

फेब्रुवारी महिना संपत असतानाच हवामानाने लहर बदलल्याची जाणीव तीव्र होणार आहे. गेले काही दिवस राज्यात कमाल तापमानात वाढ होत आहे. आता उन्हाळा तीव्र होण्याची लक्षणे दिसत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानुसार, पुढच्या दोन दिवसांत उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. राज्यभरात कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार आहे. त्याच वेळी राज्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्याने वेधशाळेने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 29 फेब्रुवारी आणि 1 मार्चसाठी हा अलर्ट आहे.भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढचे दोन ते तीन दिवस राज्यभर किमान तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढणार आहे. कमाल तापमानसुद्धा पुढच्या 48 तासांत चढेच राहणार.

असल्यामुळे उन्हाळ्याची जाणीव तीव्र होईल. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल आणि किमान तापमानातसुद्धा 3 अंशांपर्यंत वाढ होईल. याचा अर्थ रात्रीच्या वेळी आणि पहाटे जाणवणारा सुखद गारवाही पुढच्या काही दिवसात अनुभवता येणार नाही. एकीकडे उन्हाचा चटका वाढत असतान विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकणी 29 फेब्रुवारीपासून दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आठवड्यातही गोंदिया आणि पूर्व विदर्भात गारपीट झाली होती. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं होतं.

- Advertisement -

विदर्भात ऑरेंज अलर्ट
29 फेब्रुवारीला विदर्भात काही ठिकाणी गडगडाटासह वादळी पाऊस पडू शकतो. वेधशाळेने या भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 1 मार्चलाही हवामान ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -