घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकोर्टाच्या निकालाची फिकीर नाही, कुत्रा निशाणीवर लढलो तरी माझा विजय निश्चित :...

कोर्टाच्या निकालाची फिकीर नाही, कुत्रा निशाणीवर लढलो तरी माझा विजय निश्चित : अब्दुल सत्तार

Subscribe

नाशिक : सुप्रीम कोर्टाचा निकाल आम्ही हसत-खेळत मान्य करू. मला निकालाची धास्ती नाही. आपली लोकल गाडी आहे. हात दाखवा आणि गाडी थांबवा. त्यामुळे मी कुत्रा निशाणीवर लढलो तरीही सत्तार आमदार पक्का, असे वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. आगामी विधानसभा निवडणुकीत जिंकून येऊच, असा विश्वासही सत्तार यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल आता कधीही जाहीर होऊ शकतो. वकील असीम सरोदे यांनी येत्या 11 किंवा 12 मे रोजी सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. या निकालातून महाराष्ट्रातील पुढील राजकीय घडामोडी स्पष्ट होणार आहेत. या निकालानंतर अनेक घडामोडींची शक्यता आहे. कदाचित महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघण्याचीदेखील शक्यता आहे. सत्तासंघर्षाच्या निकालाआधी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडींना जास्त महत्त्व आहे. कारण निकालानंतर या घडामोडी अंतिम टप्प्यावर जाणार आहेत. असे असताना शिवसेना नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले.

- Advertisement -

सत्तार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पक्षाचे कॅप्टन आहेत. आता आमचे कॅप्टनच गेले तर बाकी काही बघण्याचा प्रश्नच नसतो. आता त्या 16 आमदारांमध्ये मीदेखील आहे. राजकारणात प्लॅन ए, प्लॅन बी असतो. पण प्लॅनप्रमाणेच घडते असेही नाही. आम्ही गेलो किंवा राहिलो तरी इतिहास राहणार. हा निर्णय देशासाठी लागू होईल, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.

पवारांनी तवाच पलटी मारला

यावेळी सत्तार यांनी पवारांच्या राजीनाम्यावरुन ठाकरे गटावर निशाणा साधला. दुसरी शिवसेना तोंडघशी पडली असेल. शिवसेना आता आमची आहे. शरद पवार एकाच तिरात अनेक पक्षी मारतात. पवारांनी भाकरी फिरवण्याऐवजी तवाच पलटी मारला. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीतील नवीन पिढी घडावी, असे त्यांना वाटले असावे. माझ्या अडीच वर्षाच्या कालावधीत उद्धव ठाकरे एकदाच मंत्रालयात गेले असावेत. पवारांनी पुस्तकात दोनदा लिहिले असेल तर माहित नाही पण माझ्या माहितीप्रमाणे एकदाच, असा टोलाही सत्तार यांनी लगावला.

- Advertisement -

वज्रमूठ तोडण्यास सकाळचा भोंगा कारणीभूत

शरद पवार म्हणतात शिवसेनेची अशी परिस्थिती झाली नसती. ठाकरे गट म्हणतो, राष्ट्रवादीची जी परिस्थिती झाली ती झाली नसती. वज्रमूठमधली एक मूठ गेली. नंतर दुसरी जाणार, तिसरी जागेवरच राहणार. सकाळचा भोंगा वज्रमूठ तोडण्याचे काम करतोय. आमच्या मतावर ते खासदार झाले हे विसरले. माझे मत त्यांना दिले, आता ते आम्हाला शिव्या देतात. वज्रमूठ तुटण्याचे कारण सकाळचा भोंगा आहे. रोज सकाळी सात-आठ वाजता तुमच्यासमोर वाजतो आणि त्याचे परिणाम महाराष्ट्रावर होतात, अशी टीका अब्दुल सत्तार यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -