कुणाला किती पैशांच्या ऑफर दिल्या गेल्या आहेत हे मला चांगलेच ठाऊक आहे, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केले.
राज ठाकरे यांनी शनिवारी आपल्या कोकण दौर्यादरम्यान राजापूर तालुक्याला भेट दिली. यावेळी उपस्थितांना संबोधताना त्यांनी हे विधान केले. ते म्हणाले की, राज्यात सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे, परंतु महाराष्ट्र सैनिक फुटत नाहीत त्याबद्दल त्यांचा अभिमान आहे. पैशांची आमिषे दाखवली जात आहेत. कोणा कोणाला किती पैशांच्या ऑफर गेल्या मला माहिती आहे, पण कडवट, निष्ठावान असणे या गोष्टीचे यशात रूपांतर होईल याबाबत निश्चिंत राहा.
येणार्या मुंबई महापालिका असो, ठाणे असेल गेल्या दोन-अडीच वर्षांत निवडणुकांची पाईपलाईन तुंबली आहे. ती पुढच्या फेब्रुवारी, मार्चमध्ये मोकळी होईल, पण पुन्हा जानेवारीत कोकणात येणार आहे आणि सूचना, कार्यक्रमांची अंमलबजावणी झाली की नाही हे पाहणार आहे. त्यावेळी पुन्हा आपले दर्शन होईल. मला जे काही तुमच्यासमोर मांडायचं आहे, कोकणासंदर्भात, महाराष्ट्रासंदर्भात, मराठी माणसासंदर्भात, हिंदुत्वासंदर्भात ते सगळे विचार त्यावेळी निश्चित मांडेन, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.