घरमहाराष्ट्र३९ वर्षे मी शिवसेनेत, मला बर्‍याच गोष्टी मला माहीत

३९ वर्षे मी शिवसेनेत, मला बर्‍याच गोष्टी मला माहीत

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा पुढचा प्रवास आजपासून रत्नागिरीतून सुरू झाला. यावेळी राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेतृत्वाला आणि राज्य सरकारला आव्हान दिले. ‘मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो. त्यामुळे मला बर्‍याच गोष्टी माहीत आहेत’, असे नमूद करत राणे यांनी सूचक शब्दांत इशारा दिला. नारायण राणेला धमक्या देण्याचा प्रयत्न करू नका. माझ्याकडे तुमच्याबाबत भरपूर मसाला आहे, असे सांगताना राणे यांनी गंभीर विधान केले.

वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कुणी सांगितले
‘स्वत:च्या भावाच्या पत्नीवर म्हणजेच वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कुणी सांगितले, कुणाला सांगितले?, हे मला माहीत आहे. हे सगळे मी एकेक करून बाहेर काढणार आहे. माझा घसा एकदा बरा होऊ दे. मग यांना मी सोडणार नाही. मी खणखणीत वाजणार. तुम्हाला काय करायचे ते करा’, असे सांगत राणे यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. माझ्या जुन्या गोष्टी काढणार असे म्हणाले. दोन वर्षे झाली शोधताहेत; पण त्यांना काही मिळाले नाही, असे नमूद करताना आता मी जुन्या गोष्टी बाहेर काढणार आहे. रमेश मोरेची हत्या कशी झाली?, त्यामागे काय कारण होते? जयंत जाधव यांची हत्या कशातून झाली? हे सगळे मला माहीत आहे आणि ते मी लवकरच बाहेर काढणार आहे, असा इशारा राणे यांनी दिला. सुशांतसिंह राजपूत मृत्यू आणि दिशा सालियन या केस संपलेल्या नाहीत. मी केंद्रामध्ये मंत्री आहे, याची आठवण ठेवा, असेही राणे पुढे म्हणाले.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते. मुंबईत राणे यांच्या बंगल्यावर शिवसैनिकांनी युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. त्यावर राणे यांनी धमकीवजा इशारा दिला. आमच्या घरासमोर कोण तो वरुण सरदेसाई…वरून खाली आला. घरावर हल्ल्याचा प्रयत्न करूनही त्याला अटक करण्यात आली नाही. यांचा नातलग आहे ना तो…म्हणून एवढी वट पण ज्यांना पोलीस बंदोबस्त नव्हता त्यांनी मार खाल्ला, असे सांगताना यापुढे माझ्या घरावर चाल करून आलात तर परत जाणार नाहीत. तुम्हाला आम्ही सोडणार नाही, इतके लक्षात ठेवा, असा इशारा राणे यांनी दिला. आगामी निवडणुकीत सगळे आमदार खासदार आपले हवेत. शिवसेना कुठे औषधालाही सापडता कामा नये, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, असे आवाहनही राणे यांनी कार्यकर्त्यांना केले.

*संजय राऊत आणि विनायक राऊत हे शिवसेनेला बुडवतील
*मी एवढा क्रिमिनल होतो तर मुख्यमंत्री कसे केले. मंत्रीपद कसे काय दिले
* भविष्यात युती झाली तर आमचे प्रमुख नेते जे बोलतील ते मला मान्य असेल
* कोकणातील बागायतदारांना आत्महत्या करण्याची वेळ मी येऊ देणार नाही
*रमेश मोरे, जयंत जाधवाची हत्या कशी झाली? त्याची कारणे काय आहेत
* केंद्रीय मंत्र्याला अटक करून काय पराक्रम केलात?

- Advertisement -

सख्ख्या चुलत भावाची हत्या कोणी केली – विनायक राऊत
केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याची वेळच का यावी? याचा अभ्यास नारायण राणे यांनी केला तर बरे होईल. ज्यावेळी नारायण राणे इतरांवर आरोप करतात तेव्हा अंकुश राणेसारख्या सख्ख्या चुलत भावाची हत्या कोणी केली? कुठे झाली? हत्या केल्यानंतर कोणत्या गाडीत टाकले आणि जाळले याची कधी विचारपूस केली आहे का तुम्ही? असे मला त्यांना विचारायचे आहे. त्याचबरोबर तुमच्या मुलाने चिंटू शेखला ऑफिसात जाऊन गोळ्या घातल्या. त्याची कधी विचारपूस केली आहे का? असे गंभीर आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर केले.

बाहेरुन आलेल्या लोकांनी संंबंध बिघडवलेसंजय राऊत
बाहेरुन आलेल्या लोकांनी शिवसेना-भाजपमधील संबंध बिघडवल्याची टीकाही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. यापूर्वी कधीच शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले नव्हते. मात्र, बाहेरुन आलेल्यांना दोन पक्षांमध्ये संघर्ष हवा असल्याने अशी वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप राऊत यांनी केली. बाळासाहेब ठाकरे आणि अटलजी, बाळासाहेब आणि अडवाणी यांचे संबंध कसे होते. तसेच बाळासाहेब, त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांचे नरेंद्र मोदींसोबत कसे संबंध आहेत हे आम्हाला माहितीय. मात्र, ज्यांना हे माहिती नाहीय तेच लोक चिखलफेक करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -