घरमहाराष्ट्र...तर पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, उद्धव ठाकरेंचा विश्वास

…तर पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, उद्धव ठाकरेंचा विश्वास

Subscribe

जे शिवसेनाप्रमुखांचं वचन होतं ते मी पूर्ण केलेलं आहे. आम्ही काय हिंदुत्व सोडलं, उलट त्यांना घेऊन आम्ही हिंदुत्व वाढवत होतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवरही जोरदार हल्ला चढवलाय

मुंबईः तुम्ही साथ, सोबत भक्कपणाने दिलेलीच आहे. ही तुमच्या मनातील आग आहे, या आगीतून उद्या शिवसेनेचे वणवा पेटणार आहे. त्यात सर्व गद्दारांची गद्दारी रावणासारखी जळून भस्म होणार आहे. तुम्ही साथ आणि सोबत द्या, मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणालेत. शिवसेनेचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

पाच वर्षं आम्ही तुमच्याबरोबर होतो, तेव्हा अशोक चव्हाणांना कसे जाऊन भेटले होतात, याचा गौप्यस्फोट अशोक चव्हाणांनीच केलेला आहे. आम्ही सोबत असतानाही औरंगाबादचं संभाजी नगर केलं नाही, उस्मानाबादचं धाराशीव केलं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सोबत असताना ते मी केलेलं आहे. जे शिवसेनाप्रमुखांचं वचन होतं ते मी पूर्ण केलेलं आहे. आम्ही काय हिंदुत्व सोडलं, उलट त्यांना घेऊन आम्ही हिंदुत्व वाढवत होतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवरही जोरदार हल्ला चढवलाय.

- Advertisement -

घोषणांची अतिवृष्टी आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असं हे सरकार आहे. म्हणून मला चिंता नाही. मी लढणाऱ्या पित्याचा लढणारा पुत्र आहे. शिवसेनेच्या पहिल्या दिवसापासून मी शिवसेनेवर आलेली संकटं बघत मोठा झालेलो आहे. आजही माझ्या हातात काही नाही. माझ्यासोबत चालायचं असेल तर निखाऱ्यावरून चालायची तयारी पाहिजे. तयारी आहे तुमची, वाटेत काटे असतील, खडे असतील टोचतील पाय रक्तबंबाळ होतील. चालणार आहात का?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना विचारलाय.

जसं मी माझ्या पित्यांना शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं की शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, तसेच तुम्हाला मी वचन देतोय. तुम्ही साथ, सोबत भक्कपणाने दिलेलीच आहे. ही तुमच्या मनातील आग आहे, या आगीतून उद्या शिवसेनेचे वणवा पेटणार आहे. त्यात सर्व गद्दारांची गद्दारी रावणासारखी जळून भस्म होणार आहे. तुम्ही साथ आणि सोबत द्या, मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

- Advertisement -

एका अर्थी झालं ते बरं झालं. बांडगुळं सगळी छाटली गेली, बांडगुळं आपल्या फांद्यांवरती आपण पोसत होतो. पण त्या बांडगुळांच्या एक गोष्ट लक्षात आलेली नाही. बांडगुळांची मुळं ही वृक्षाच्या फांदीत असतात. पण वृक्षाची मुळं ही जमिनीमध्ये असतात. ती जमिनीमध्ये रुजलेली आहेत. पण बांडगुळाला स्वतःची ओळख नसते. कोणी असं विचारलं तर तो सांगू शकत नाही, तू कोणी मी बांडगूळ, कोणी तरी म्हटलं त्यांना बांडगूळ सेना म्हणा, त्यांना मी म्हटलं त्यांचा मी अपमान करू शकत नाही. त्यांना आता शिंगावर घेऊन प्रत्येक निवडणुकीत पाणी पाजावं लागेल. प्रत्येक निवडणुकीत त्यांच्यावर विजय मिळवून दाखवावाच लागेल, असंही ते म्हणालेत.


हेही वाचाः …पण शेवटी ते शिपाईच राहिले, भास्कर जाधवांचा राणेंवर प्रहार

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -