घरताज्या घडामोडीराज्यात चार वर्षात २७ हजार ८८९ नेत्रदान

राज्यात चार वर्षात २७ हजार ८८९ नेत्रदान

Subscribe

राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीबाधितता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यात गेल्या चार वर्षांत २७ हजार ८८९ नेत्रदान झाले.

राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीबाधितता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यात गेल्या चार वर्षांत २७ हजार ८८९ नेत्रदान झाले. आतापर्यंत ७४ नेत्रदान केंद्र स्थापित झाले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने राज्य शासनाच्या समन्वयातून देशभर ‘राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीबाधितता नियंत्रण कार्यक्रम’ राबविण्यात येतो. वर्ष २०१६-२०१७ ते २०१९-२० आर्थिक वर्षानुसार देशातील ३६ राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये आतापर्यंत २ लाख ६४ हजार ६९५ नेत्रदान झाले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी दिली.

राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीबाधितता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यात गेल्या चार वर्षांत २७ हजार ८८९ नेत्रदान झाले आहे. राज्यात वर्ष २०१६-१७ मध्ये निर्धारीत ७ हजार नेत्रदानाच्या तुलनेत जास्त म्हणजे ७ हजार ५१४ जणांनी नेत्रदान केले. वर्ष २०१७-१८ मध्ये निर्धारीत ७ हजार नेत्रदानाच्या तुलनेत ७ हजार ५६० तर वर्ष २०१८-१९ मध्ये निर्धारीत ७ हजार नेत्रदानाच्या तुलनेत ७ हजार ३२३ दात्यांनी नेत्रदान केले. वर्ष २०१९-२० या चालू आर्थिक वर्षात निर्धारीत ७ हजार ५०० च्या तुलनेत आतापर्यंत ५ हजार ४९२ नेत्रदान झाले आहे. तसेच, गेल्या चार वर्षांत देशात एकूण ३८० नेत्रदान केंद्र उभारण्यात आले. महाराष्ट्रात ७४ नेत्रदान केंद्र उभारण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी लोकसभेत लेखी उत्तरातून ही माहिती दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -