घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र"वाढता स्क्रीनटाईम धोकेदायक"; काय म्हणाल्या बालरोगतज्ज्ञ डॉ. संपदा तांबोळकर

“वाढता स्क्रीनटाईम धोकेदायक”; काय म्हणाल्या बालरोगतज्ज्ञ डॉ. संपदा तांबोळकर

Subscribe

नाशिक : मोबाईलचा वाढता वापर सर्वांना घातक ठरणारा आहे. वाढता स्क्रीन सर्वांनाच धोकेदायक आहे. मोबाईल मुलांच्या बुध्दीमत्तेवर आणि मानसिकतेवर घातक परिणाम करत आहे. सर्वांनी स्क्रीनटाईम कमी करणे आवश्यक आहे. पालकांनी याबाबत जागरुक राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बालरोगतज्ज्ञ डॉ. संपदा तांबोळकर यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), पुणे येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्राध्यापिका, बालरोगतज्ज्ञ डॉ. संपदा तांबोळकर प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमास व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे, मतनिसच्या अध्यक्षा योगिता पाटील, सचिव शिल्पा पवार उपस्थित होत्या.

- Advertisement -

डॉ. संपदा तांबोळकर म्हणाल्या की, महिलांनी कुटुंबाची काळजी घेताना मुलांवर अधिक लक्ष केंद्रीत केले पाहिजे. मुलांना संतुलीत आहार गरजेचा असून त्यासाठी रोजच्या स्वयंपाकात विविध जीवनसत्व, प्रथिन व कार्बोहाड्रेटस् असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. पॅकिंग फुट खाणे शक्य झाल्यास टाळावे. तरुण वयात येणााया मुलांची व मुलींची मानसिकता पालकांनी ओळखणे गरजचे आहे. या वयात वाईट व्यसनं लागण्याची शक्यता अधिक असते. यासाठी मुलांसमवेत दररोज काही वेळ घालवावा अन्य विषयांवर चर्चा करावी. सामाजिक बांधिलकी, आज्ञाधारपणा व वक्तशीरपणा यांचे रोपण करावे तर पुढील पिढी वरिष्ठांचा आदर करेल. यासाठी घरातील महिलानांनी अधिक सजग व दक्ष राहणे गरजेचे आहे.

कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) म्हणाल्या की, समाजाला पुढे नेण्यासाठी स्त्री शिक्षणाबरोबर त्यांचा सन्मान झाला पाहिजे. ’संशोधन तंत्रज्ञान याचा उपयोग लिंगभाव समानतेसाठी’ असा या वर्षाच्या जागतिक महिला दिनाची थीम आहे. या अनुषंगाने महिलांनी टेक्नॉलॉजी अणि ऑनलाईन क्षेत्रात मोठी भरारी घ्यावी असे त्यांनी सांगितले. महिला आर्थिक, वैचारीकरित्या स्वावलंबी आणि सक्षम होण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींनी महिलांच्या उपक्रमांना पाठींबा देणे गरजेचे आहे. यासाठी स्त्री-पुरुष समानता जोपासण्यात यावी. महिलांनी सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली आहे. समाजातील महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित आहे. योग्य वर्तण व ज्ञानसमृध्द होण्यासाठी वाचन व क्रीडा संस्कृती जोपासली पाहिजे तरच महिलांसह समाज सक्षम होईल.

- Advertisement -

कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ म्हणाले की, आरोग्य क्षेत्राबरोबर अवकाश संशोधन, तंत्रज्ञान, औषध, कला व उद्योग आदी क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली आहे. आपल्या संस्कृतीत महिला व मातांचा आदर करण्यात येतो. महिलांचे कर्तृत्व समाजासाठी प्रेरणादायी आहे. महिला प्रत्येक कामात निपुण असतात. विद्यापीठातर्फे राबविण्यात येणााया उपक्रमांत मुलींना व महिलांना काम करण्याची समान संधी देण्यात. महिला दिनानिमित्त विद्यापीठात रांगोळी स्पर्धा व मॉकटेल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धेत श्रीमती आशा वाबळे यांनी प्रथम व श्रीमती शितल शिंदे यांना व्दितीय आाणि श्रीमती ज्योती इटणकर यांनी उपविजेता म्हणून बक्षिस मिळविले. मॉकटेल स्पर्धेत विविध पदार्थापासून हेल्थी ज्यूस तयार करण्यात आले होते. या स्पर्धेत कांचन सानप यांनी प्रथम, ज्योती कर्नाटकम् यांनी व्दितीय आणि लीना आहिरे यांनी उपविजेता ठरल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -