घरक्रीडा१३ वर्षांनंतर भारत-पाकिस्तान सामना; आज टेनिस क्रिकेट सामना रंगणार

१३ वर्षांनंतर भारत-पाकिस्तान सामना; आज टेनिस क्रिकेट सामना रंगणार

Subscribe

आज सायंकाळी आठ वाजता भारत-पाकिस्तान टेनिस क्रिकेट सामना रंगणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २००८ साली अखेरचा कसोटी सामना खेळविण्यात आला होता. पण या दोन्ही देशांमध्ये अखेरची क्रिकेट मालिका २०१३ साली खेळविण्यात आली होती. त्यामुळे जवळपास गेली १३ वर्षे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मालिका खेळवण्यात आली नव्हती. पण आज सायंकाळी आठ वाजता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये एक सामना रंगणार असून तो सामना शारजामध्ये रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या बऱ्याच वर्षांपासून एकत्र मालिका खेळलेली नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत फक्त वर्ल्डकपमध्ये सामने झाले आहेत. पण दोन्ही देशांमध्ये सामने झालेले नाहीत. आज या दोन्ही देशांमध्ये एक क्रिकेटचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना भारत किंवा पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये खेळवण्यात येणार नसून हा सामना शारजा येथे खेळविण्यात येणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आज टेनिस क्रिकेटचा सामना रंगणार आहे. हा सामना १० षटकांचा असणार आहे.

ind-pak 2
१३ वर्षांनंतर भारत-पाकिस्तान सामना खेळणार

मुंबईवर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी २००८ साली हल्ला केला होता. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानबरोबर खेळण्यास नकार दिला होता. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट मालिकांवरून एक करार झाला होता. पण भारताने या करारानुसार सामने खेळले नाही, अशी तक्रार पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत केली होती. पण या गोष्टीचा फायदा पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाला झाला नाही. सध्याच्या घडीला पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळ भारताबरोबर सामना खेळण्यासाठी प्रयत्नशील आहे.

- Advertisement -
ind-pak 1
१३ वर्षांनंतर भारत-पाकिस्तान सामना खेळणार

हा आहे भारताचा संघ

अंकुर सिंग, मोयोद्दिन शेख, दिनेश नाडकर्णी, ओंकार देसाई, अजित मोहिते, विश्वनाथ ताकूर, उस्मान पटेल, योगेश पेणकर, विजय पावळे, कृष्णा सातपुते, सुमीत देखणे, जाफर जमाल, थॉमस डायस, सरूज, सुलतान खान आणि प्रशिक्षक भरत लोहार, व्यवस्थापक जावेद शेख असा भारताचा संघ आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -