घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला 'बहिणाबाई चौधरी' यांचे नाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला ‘बहिणाबाई चौधरी’ यांचे नाव

Subscribe

जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री 'बहिणाबाई चौधरी' यांचे नाव दिले जाणार आहे. येत्या ११ ऑगस्ट रोजी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त हा नामविस्तार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री ‘बहिणाबाई चौधरी’ यांचे नाव देण्यात येणार आहे. या निर्णयाला विधानसभेत एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी याबाबत विधेयक सभागृहात मांडले. त्यावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, गणपतराव देशमुख, शशिकांत शिंदे, संजय सावकारे, ज्ञानराज चौगुले, छगन भुजबळ, हर्षवर्धन सपकाळ, अजित पवार, मंदा म्हात्रे, दिलीप वळसे-पाटील आणि हरिभाऊ जावळे यांनी चर्चा करीत बहिणाबाईं चौधरींचे नाव देण्याचे मान्य केले आहे.

अनेक वर्षांनंतर मागणीला परवानगी

१५ ऑगस्ट १९९० रोजी जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. या विद्यापीठात जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. या विद्यापीठीची स्थापना झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री ‘बहिणाबाई चौधरी’ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. बहिणाबाई यांचे नाव देण्यासाठी अनेक आंदोलने देखील करण्यात आली होती. अखेर या मागणीला अनेक वर्षांनी परवानगी मिळाली आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री ‘बहिणाबाई चौधरी’ यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीस यांनी केली. तसेच विधेयकावर झालेल्या चर्चेला एकमताने पाठिंबा दिल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सभागृहाचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठामध्ये बोली भाषा वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असून विद्यापीठाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

बहिणाबाईंच्या जयंतीनिमित्त होणार नामविस्तार

बहिणाबाई चौधरी यांची येत्या ११ ऑगस्ट रोजी जयंती असल्याने या दिवशी विद्यापीठाचा नामविस्तार कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला जाणार आहे. या विद्यापीठात बहिणाबाई चौधरींच्या नावे अध्यासन सुरु करण्याबाबत देखील विचार केला जाईल, असे विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -