Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Jalna Maratha Protest : जालन्यातील घटना म्हणजे..., संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

Jalna Maratha Protest : जालन्यातील घटना म्हणजे…, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

Subscribe

जालन्यातील घटनेचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटायला सुरुवात झाली असून या प्रकरणामुळे अनेक जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. या प्रकरणी आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई : जालन्यात घडलेल्या घटनेचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटायला सुरुवात झाली असून या प्रकरणामुळे अनेक जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. काल झालेल्या या घटनेनंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून काही भागात जाळपोळ करण्यात आली. ज्यामुळे आता मराठा आंदोलक हे हिंसक झालेले पाहायला मिळत आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरण देखील तापले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची जबाबदारी घेत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राऊतांकडून यावेळी अनेकदा सरकारवर दंगलीचे आरोप करण्यात आलेले आहेत. याआधी देखील त्यांनी निवडणुकीपूर्वी सरकार दंगल घडवून आणेल असे सांगितले आहे. त्याचबाबत आता पुन्हा एकदा वक्तव्य करत राऊतांनी जालन्यातील ही घटना दंगली घडवून आणण्यासाठी टाकलेली पहिली ठिणगी असल्याचा आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी या घटनेबाबत आपले मत व्यक्त केले. (Jalna Maratha Protest: Sanjay Raut makes serious allegations against the government)

हेही वाचा – जालन्यातील मराठा आंदोलन चिरडल्यानंतर संजय राऊतांचे सरकारवर शरसंधान

- Advertisement -

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, निवडणुकीत विविध मार्गाने दंगली घडवल्या जातील हे मी सांगत होतो. त्याला जालन्यातील लाठीमाराचे प्रकरण प्रमाण आहे. महाराष्ट्रात जाळपोळ झाली. हे सरकारचे अपयश आहे. सरकारला हेच हवे आहे. निवडणुकीआधी राज्यात जातपात, धर्मावर दंगल घडवायची आहे. त्याची पहिली ठिणगी जालन्यातून पडली आहे, असा गंभीर आरोपही राऊतांकडून करण्यात आला. तर, आतापर्यंत अनेक मोर्चे निघाले. पहिल्यांदाच मोर्चे निघाले नाहीत. मराठा समाजाने शिस्तबद्ध मोर्चे काढले आहेत. त्यांनी कधीच कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन केलं नाही. अशावेळी जाणीवपूर्वक लाठी हल्ला करून तणाव निर्माण केला गेला. इंडिया बैठकीवरून लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी हा सुनियोजित केलेला हल्ला आहे. हे शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे वैफल्य आहे, असेही राऊतांकडून सांगण्यात आले.

गृहमंत्री कोण आहेत? खाते कुणाकडे आहे? आमच्या सरकारमध्ये आंदोलने झाली. पण कधी लाठीमार केला नाही. या आंदोलकांवर हल्ला का केला? यामागे राजकीय सूसूत्रता आहे. मुंबईत इंडियाची बैठक सुरू होती. देशातील जनता या इंडियाच्या बैठकीकडे लक्ष देऊन होती. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची भाषण सुरू होती. सर्व चॅनलवर दाखवले जात होते. त्यावरून लक्ष हटवण्यासाठी जालन्यात लाठीमार करून गोंधळ निर्माण केला गेला, असा दावा राऊतांकडून करण्यात आला.

- Advertisement -

राज्यात मागील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीला काल (ता. 01 सप्टेंबर) जालन्यात वेगळे वळण लागले. मागील चार दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांना पांगविण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आल्याची घटना घडली. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे गेल्या चार दिवसांपासून आंदोलन करण्यात येत होते. 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे हे आपल्या 10 सहकाऱ्यांसोबत आमरण उपोषणाला बसले होते. त्याचवेळी पोलिसांकडून या आंदोलनाला चिरडण्यासाठी अमानुषपणे लाठीहल्ला करण्यात आला. त्याचवेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आल्याचे देखील आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -