घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठामपणे उभा : जयंत पाटील

महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठामपणे उभा : जयंत पाटील

Subscribe

अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोकण विभागात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोकणात बाळाराम पाटील यांच्यासारखा चांगला उमेदवार पराभूत झाला. त्याची कारणे जगजाहीर आहेत. प्रचंड धनशक्तीपुढे सरळमार्गी बाळाराम पाटील यांचा निभाव लागला नाही परंतु लोकांच्या मनात बाळाराम पाटीलच आहेत. याबद्दल माझ्या मनात शंका नाही असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

 

मुंबईः मतांचा कल व मताधिक्य बघितले तर महाराष्ट्र किती मोठ्याप्रमाणावर महाविकास आघाडीच्या पाठीमागे एकसंघपणे उभा आहे हे चित्र यातून दिसून येते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी दिली.

- Advertisement -

अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोकण विभागात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोकणात बाळाराम पाटील यांच्यासारखा चांगला उमेदवार पराभूत झाला. त्याची कारणे जगजाहीर आहेत. प्रचंड धनशक्तीपुढे सरळमार्गी बाळाराम पाटील यांचा निभाव लागला नाही. परंतु लोकांच्या मनात बाळाराम पाटीलच आहेत. याबद्दल माझ्या मनात शंका नाही असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील म्हणाले,  इंडिया टूडेचा जो सर्व्हे आला होता तो खरा आहे याची पुन्हा एकदा प्रचिती या निवडणूक निकालावरून आली आहे. ग्रामपंचायत, नगरपंचायतमध्ये आमची महाविकास आघाडी पुढे आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील सुशिक्षित मतदारांनीदेखील महाविकास आघाडीला कौल दिला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात धोका देण्याचे जे काम झाले ते महाराष्ट्राने मान्य केलेले नाही. महापुरुषांचा अपमान करण्याचे काम  सातत्याने सत्तारुढ पक्षाकडून व मंत्री आणि राज्यपालांकडून झाले आहे. ते महाराष्ट्राने सहन केलेले नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यामागे महाराष्ट्र ठामपणाने उभा आहे हे यावरून सिद्ध झाले आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

नाशिकमध्ये भाजपला उमेदवार उभा करता आला नाही. उभा करायचा की नाही या द्विधा मनस्थितीत ते होते. तर दुसरीकडे कॉंग्रेसवतीने सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली गेली होती. उमेदवारी भरताना थोडासा गोंधळ झाला. त्यानंतर सत्यजित तांबे हे उमेदवार म्हणून लोकांसमोर गेले त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यात भाजपचा रोल राहिलेला नाही. महाविकास आघाडीच्या विचारांची लोकं महाराष्ट्रात दिसून आली आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.

भाजपचे अध्यक्ष ज्या भागात आहेत, उपमुख्यमंत्री ज्या भागात आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, वनमंत्री ज्या भागात राहतात त्या भागात उमेदवार मिळू शकला नाही तर महाराष्ट्राच्या दुसर्‍या भागात उमेदवार कसा मिळणार असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर आम्हाला प्रतिक्रिया द्यायची नाही त्यांच्या नागपूर विभागातील जनता त्यांच्याबरोबर नाही हे या मताधिक्याने सिध्द झाले आहे असा थेट हल्लाबोलही जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना केला.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -