घरताज्या घडामोडीलोकांची दिशाभूल करुन सरकारला बदनाम करण्यात येतंय, जयंत पाटील यांची टीका

लोकांची दिशाभूल करुन सरकारला बदनाम करण्यात येतंय, जयंत पाटील यांची टीका

Subscribe

भुजबळ अफाट काम करत आहे. त्यांच्या विभागाची शिवभोजन थाळी योजना देशभर गाजत आहे.

राज्य सरकार चांगले काम करत असल्यामुळे टीका करण्यात येत आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे ईडीची चौकशी लावण्यात आली आहे. ज्यांनी आरो केले आहेत ते पळून गेले असताना त्यांच्यावर का विश्वास ठेवला जातोय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. लोकांची दिशाभूल करुन राज्य सरकारला बदनाम करण्यात येत असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे. राज्य सरकार चांगलं काम करत असताना नाहक त्रास दिला जात असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना तुरुंगात डांबण्याचे काम भाजप सरकारने केले. परंतु कोर्टाने त्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे भाजपची यंत्रणा लागली आहे. देशमुखांवर आरोप करणारे परमबीर सिंग देश सोडून पळून गेले आहेत. त्यांच्या आरोपावर ईडी व इतर यंत्रणांनी का विश्वास ठेवावा असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -

लोकांची दिशाभूल करुन सरकारला बदनाम करण्याचे काम होते आहे. सरकार चांगले काम करत असताना नाहक त्रास दिला जात आहे. हे लोकांपर्यंत जाण्याची गरज असल्याचे जयंत पाटील म्हणाले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली चांगले काम झाले आहे. भुजबळ यांच्या कल्पकतेमुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यात यश आलं असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

तसेच आपण जलसंपदा मंत्री झाल्यापासून जरा जास्तच पाऊस पडतोय. जायकवाडी धरण भरुन वाहतेय. मात्र इथल्या शेतकऱ्यांना जास्त पाऊस पडून उपयोग नाही. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार करणार आहे असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले. भुजबळ नेतृत्व जपण्याचे काम आपण केले आहे. आपले फक्त ५४ आमदार आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे यापेक्षा जास्त निवडून आणण्यासाठी केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज आहे असे जयंत पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

भुजबळ अफाट काम करत आहे. त्यांच्या विभागाची शिवभोजन थाळी योजना देशभर गाजत आहे. हे काम आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवायला हवं. हे कधी शक्य होईल जेव्हा आपले संघटन मजबूत असेल असेही जयंत पाटील म्हणाले. बुथ कमिट्यांचे काम सक्षमपणे करा त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन करू. पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी उत्तरेकडे वळवण्याचा पहिला प्रयत्न आम्ही मांजरपाडा धरणाच्या माध्यमातून केला. हा प्रयोग यशस्वी झाला तो भुजबळांच्या पाठपुराव्याने. भुजबळसाहेबांना आधुनिक युगाचा भगीरथ म्हटलं तर वावगं ठरणार नाही असेही गौरवोद्गार जयंत पाटील यांनी काढले.


हेही वाचा : भावना गवळींना वर्षावर नो एंट्री, मुख्यमंत्र्यांची अर्धा तास वाट बघून भेटीशिवायच परतल्या


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -