देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. कोरोनाबधितांच्या वाढत्या संख्येने आणि वाढत्या मृत्यूदराने देशाची परिस्थिती भयावह झाली आहे. तर कोरोना रुग्ण वाढल्याने देशासह राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. देशावरील कोरोना संकट अधिक गडद होताना दिसत आहे. देशावरील वाढते कोरोनाचे संकट पाहून मला असहाय आणि उदास वाटते आहे. आपण कशासाठी आहोत असे भावनिक ट्विट राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नाही आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीचे राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन या संकटावर मात करु अशी सार्थ हाक जितेंद्र आव्हाड यांनी सर्व राजकारण्यांना मारली आहे.
देशात आणि राज्यात वाढणाऱ्या परिस्थितीवर जर वेळीच मात केली नाही तर याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागणार आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाची साखळी रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहे. राज्य सरकारद्वारे कठोर निर्बंध लागू केले आहेत. परंतु तरिही विनाकारण नागरिक घराबाहेर पडत आहेत. वाढत्या कोरोनाबाधि रुग्णांची आकडे आणि कोरोना परिस्थिती पाहून मन सून्न झाले असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
देशात कोरोना प्रादुर्भावाची भयावह परिस्थिती पाहून मला असाहय आणि उदास वाटत आहे. आपण कशासाठी आहोत? देशातील कोरोनाबाधित रुग्णांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. चला लोकांचे रक्षण करण्यासाठी आपले राजकीय मतभेद विसरू या. एकत्र येऊन कोरोना परिस्थितीवर मात करु, लोकांनी आपल्यावर द्वेष करायला सुरुवात करु नये असे भावनिक ट्विट राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
Looking at the crisis all around the country I feel helpless and depressed.
What r we for ?
Let’s forget our political differences nd join hands to save people.The rate of growth of patients is alarming
Let not people start hating us @OfficeofUT @Dev_Fadnavis #FIGHTCOVID— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 16, 2021
राज्यातील जनता आपल्यावर रोष व्यक्त करण्याच्या आधी राजकारण बाजूला ठेवून देशावरील परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्र येऊ असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन केला आहे. परंतु तरिही गर्दीचे चित्र कायम दिसत आहे. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊन करण्याची शक्यता आहे.
जितेंद्र आव्हाडांची कविता?
खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!
कधी थाळ्या वाजवायला
लावल्या नाही…
ना कधी मेणबत्या आणि दिवे
लावायला लावले …..
निर्णय घेताना घेतले
विश्वासात…..
विरोधकांचे त्यामुळेच
फावले…….
शांत राहून तो लढत आहे
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
मंदिर उघडा, बाजार उघडा
शाळा उघडा ते म्हणाले…..
परीक्षा पुढे ढकलल्या तर
ते रस्त्यावर पुन्हा पुन्हा आले….
कोरोना वाढला तर ते आता
फक्त सरकारला दोषी ठरवत आहे…
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
इमान तर विकले नाहीच
ना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या…..
कोरोनाचे आकडे लपवले नाहीच
खोट्याने न कधी माना झुकल्या….
घरी पत्नी आणि मुलगा
आजारी असतांना तो मात्र लढत आहे….
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
ना कुठे बडबोले पणा
ना कशाचा बडेजाव..
आठ हजार कोटीचे
विमान नको….
ना कोणत्या प्रकरणात
घुमजाव……
जे करतोय ते प्रामाणिक पणे
तो करतो आहे…..
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
व्यापाऱ्यांचे ऐकून घेतोय…
विद्यार्थ्यांचे ऐकून घेतोय….
गोर गरीब जनतेला
एकवेळ शिवभोजन मोफत देतोय….
निसर्ग चक्रीवादळ,कोरोना संकट
शेतकऱ्यांच्या अडचणी
साठी तो शांततेत लढतो आहे ……
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…..!!
ना क्लीन चिट देता आली…
ना खोटी आकडेवारी देता आली…
निवडणूक काळात तर कधी
ना अशक्य घोषणा त्याला करता आली…
जे होण्यासारखे आहे तेच तो करतोय…
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
महाराष्ट्राचे मीठ खाऊन
निधी पंतप्रधान निधीला ते देताय…
उठ सूठ, सकाळ संध्याकाळ
ते टीका सरकारवर करताय…..
तो मात्र टिकेला उत्तर न देता
सर्वसामान्यांसाठी झटत आहे…
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
– डॉ.जितेंद्र आव्हाड