काँग्रेस खासदार राहुल गांधी (rahul gandhi ) भारत जोडो यात्रा काल सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे ही यात्रा दाखल झाली. देगलूरमधूनच या भारत जोडो यात्रेला आज सकाळी सहा वाजता सुरुवात झाली. पण ही यात्रा अटकळ येथे पोहोचल्यावर दुःखद घटना घडली. नांदेड येथे काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रात पहिला दिवस आहे. ही यात्रा पुढील चार दिवस नांदेड (nanded) मधेच असणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार अमर राजूरकर आणि सहकारि यांनी मिळून या यात्रेचे नियोजन केले होते. मात्र या यात्रेत आज दुःखद घटना घडली.
राष्ट्रीय सेवा दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांनी भारत जोडो यात्रेच्या (bharat jodo yatra) झेंडा तुकडीचे संचालन केले. त्यावेळी त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. कृष्णकुमार यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले गेले. पण उपचार सुरू असतानाच त्यांचे दुःखद निधन झाले. दुपारच्या कॅम्पमधे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंह, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, एच के पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, संदेश सिंगलकर, महेंद्र सिंह वोहरा यांनी कृष्णकुमार यांना श्रद्धांजली वाहली.
कृष्णकुमार पांडे (krushkumar pandey death) यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर राहुल गांधी यांच्या शिबिरस्थळी त्यांचे पार्थिव नेण्यात येईल. नंतर नागपूरला आणण्यात येईल. सध्या रुग्णालयात काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित आहेत.
कृष्ण कुमार पांडे हे मागील पाच दशकापासून काँग्रेस आणि सेवादलमध्ये सक्रीय होते. आंध्र प्रदेश, कर्नाटकसह विविध राज्याचे ते प्रभारी होते. सद्यस्थितीत त्यांच्याकडे मध्यप्रदेशची जबाबदारी होती. दीड वर्षापूर्वी त्यांचे पुत्र धीरज यांचे कोरोनाने निधन झाले झाले होते. धीरज युवक काँग्रेसचे सचिव होते.
हे ही वाचा – आमचं लक्ष्य पुढचे 15 दिवस महाराष्ट्राचं दु:ख जाणून घेणे आहे – राहुल गांधी