घरताज्या घडामोडीआघाडीच्या नेत्यांकडेही रेमडेसीवीरचा साठा, मनसेचा आरोप

आघाडीच्या नेत्यांकडेही रेमडेसीवीरचा साठा, मनसेचा आरोप

Subscribe

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या उपलब्धत्यावरून सुरु असलेल्या राजकीय वादात आता मनसेनेही उडी घेतली आहे. रेमडेसिवीरचा साठा केवळ भाजपकडेच नव्हे तर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडेही असल्याचा आरोप रविवारी मनसेने केला. रेमडेसिवीरचा साठा तसेच पुरवठयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. यापार्श्वभूमीवर मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी यासंदर्भात ट्विट करत नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा साठा आघाडीच्या आमदारांकडेही आहे. काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी त्याचे वाटपही करत आहेत. नवाब मलिक यांनी याबाबतही जरा बोलावे. तुमचे राजकारण बंद करा, जनतेचा जीव महत्त्वाचा आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांना इंजेक्शन उपलब्ध होणे गरजेचे आहे, असे अखिल चित्रे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दोन दिवसांत मुंबईतील परिस्थिती पूर्ववत होईल – किशोरी पेडणेकर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -