घरताज्या घडामोडीमृत बिबट्याची नखे काढून जमिनीत पुरले; तिघांना अटक

मृत बिबट्याची नखे काढून जमिनीत पुरले; तिघांना अटक

Subscribe

बिबट्याची नखे काढून त्याला जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लांजा तालुक्यातील वेरवली येथे ही घटना घडली असून याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपींकडून बिबट्याची नखे ताब्यात घेण्यात आली आहेत.

असा आला गुन्हा उघडकीस

लांजा तालुक्यातील वेरवली येथे एका जमिनीत मृत बिबट्यावा पुरल्याची धक्कादायक माहिती गुप्त वनविभागाला मिळाली. या मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाच्या परिक्षेत्रीय अधिकारी प्रियांका लगड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, वनविभागाने जमीन उकरुन मृत बिबट्याला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या लक्षात आले की, बिबट्याची नखे गायब आहेत. दरम्यान, याप्रकरणी वनविभागाने दिनेश पवार, रमेश साळसकर आणि शंकर देवळेकर या तिघांची चौकशी करण्यात आली. त्या चौकशी दरम्यान, त्यांनी आपण गुन्हा केल्याची कबुली दिली. तर जमिनीत पुरण्यात आलेला बिबट्या २ ते ३ दिवसांपूर्वी मृत पावल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. बिबट्याची नखे काढून तो जयश्री साळसकरक यांच्या जमिनीत पुरल्याचे समोर आले.

- Advertisement -

हेही वाचा – Mahad Building Collapse : दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर; बचावकार्य सुरूच


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -