घरताज्या घडामोडीMaharashtra Corona: टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडू नका!; अजित पवारांचा इशारा

Maharashtra Corona: टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडू नका!; अजित पवारांचा इशारा

Subscribe

पुणे जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक, पहिली ते आठवीच्या ऑफलाईन शाळा बंद

राज्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती बिकट होत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना विषयक नियम पाळावेत. राज्य सरकारला निर्बंध आणण्यासाठी टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडू नका, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पुण्यात बोलताना दिला. पुणे शहरात आज ६ हजार ८१९ लोकांची तपासणी झाली. त्यापैकी १ हजार १०४ रुग्ण हे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे १८ टक्क्यांपर्यंतचा पॉझिटिव्हीटी दर पाहायला मिळत आहे. तीन दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट आढळून येताना दिसत आहे. त्यामुळे आपण ३० जानेवारी २०२२ पर्यंत पहिली ते आठवीपर्यंतच्या ऑफलाईन शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांनी आज पुण्यात विधान भवन येथे कोरोना आढावा बैठकी घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांबाबत माहिती दिली. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित होते. यावेळी पवार यांनी पुण्यात निर्बंध अधिक कडक करण्यात आल्याचे सांगितले.

- Advertisement -

सध्या कोरोना परिस्थितीही बिकट होत चाललेली आहे. कोरोना संसर्ग वाढत आहे. मी आजच मुंबई महापालिका आयुक्त चहल यांच्याशी बोललो. तेव्हा त्यांनी सांगितले की, मुंबईतही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईने ऑफलाईन शाळा पहिली ते आठवीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला. नववीची शाळा सुरू ठेवली आहे कारण १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे ते शाळेत आल्यानंतर त्यांना लसीकरण करणे सोपे जाते. त्यासाठी त्यांनी तो निर्णय घेतला असून यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी सुद्धा मी बोललो आहे. शाळांच्या संदर्भात स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्यात आला आहे. परिस्थिती काय आहे ते पाहून त्यांनी शाळांबाबत निर्णय घ्यायचा आहे, अशी माहिती त्यांनी दिल्याचे पवार म्हणाले.

आज इथे बैठक घेत असताना, पुणे जिल्ह्यापुरती बोलायचे  तर ७४ टक्केच नागरिकांनी लशीचा दुसरा डोस घेतलेला आहे. काहीबाबतीत आज आम्ही महत्वाचे निर्णय घेतोय. परंतु जी ३६ टक्के लोक लस घ्यायचे राहिलेले आहेत त्यांनी दुसरा डोस घेतलाच पाहिजे. कारण, दोन्ही लशीचे डोस घेतले आणि जरी कोरोनाचा संसर्ग झाला तर त्याची तीव्रता कमी राहते, अशा प्रकारचा अनुभव हा आता पाहायला मिळतोय, असे पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

आज पुणे जिल्हा आणि दोन्ही महापालिकांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३० जानेवारी २०२२ पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नववीची शाळा सुरू राहील. तर, पहिली ते आठवीच्या शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू राहतील. आज आम्ही हा सगळा निर्णय घेत असताना, आयसीएमआरचे महासंचालक भार्गव यांच्याशी देखील राजेश टोपे बोलले. त्यांनी देखील सांगितले की, ही जर पॉझिटिव्हिटीची परिस्थिती १० टक्क्यांच्या पुढे गेलेली असेल तर तुम्ही तशा पद्धतीचा निर्णय घ्या, असे पवार म्हणाले.

पुणे शहरात साधारण पॉझिटिव्हचा दर १८ टक्क्यांपर्यंत गेलेला आहे. ज्यावेळेस १८ टक्क्यांवर पॉझिटिव्हिटीचा रेट जातो, त्यावेळी निश्चितपणे काळजी करण्याचा प्रश्न निर्माण होतो. ओमिक्रॉनचा प्रसार वेगाने होत आहे. पुढील ३० ते ४५ दिवसात रूग्ण संख्येचा स्फोट होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. या सगळ्या ऐकीव बातम्या आहेत. पण १०५ देशात ओमिक्रॉनचा आजच्या घडीला प्रसार झालेला आहे. आपल्या देशाबाबत बोलायचे झाल्यास २३ राज्यांमध्ये तर महाराष्ट्रात ११ ठिकाणी ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या पुणे शहरात ३ हजारांहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. यापैकी ८८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत आणि ३६ रुग्ण व्हेंटिलेटर्सवर आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

आता हा पूर्वीचा कोरोना आहे का, डेल्टा कोरोना आहे की ओमिक्रॉनचा हा विषाणू आहे यामध्ये आता फार चर्चा करण्याची गरज नाही. सुरुवातीच्या काळात ओमिक्रॉन भारतात आलेला नव्हता. त्याबाबत केंद्र आणि राज्य सरकार तसेच सर्व यंत्रणा फार बारकाईने ते बघत होती. पण ज्या प्रकारे आता संख्या पाहायला मिळत आहे, आता हा ओमिक्रॉन जवळपास आपल्या राज्यात आणि देशात वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेला आहे, असेही पवार म्हणाले.


हेही वाचा – Maharashtra Lockdown: राज्यात बुधवारी नवे कोरोना प्रतिबंधक निर्बंध जाहीर होणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -