महाराष्ट्रात कोरोनाचा धोका कायम असून रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. शनिवारी मृतांचा आकडा पुन्हा एकदा वाढलेला दिसला. शुक्रवारी राज्यात ६९५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. तर शनिवारी राज्यात ९६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर १.५१ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत ८० हजार ५१२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परंतु, एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मात्र घट झालेली पाहायला मिळाली. शनिवारी राज्यात ३४ हजार ८४८ नव्या रुग्णांची नोंद झाली. हा आकडा शुक्रवारी ४२ हजारच्या पार होता.
Maharashtra reports 34,848 new #COVID19 cases, 59,073 discharges and 960 deaths in the last 24 hours
Total cases 53,44,063
Death toll 80,512
Total discharges 47,67,053Active cases 4,94,032 pic.twitter.com/CUsl3PhxXo
— ANI (@ANI) May 15, 2021
५९ हजारहून अधिक रुग्ण बरे
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असताना राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. आज राज्यात ५९ हजार ०७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ४७,६७,०५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.२० टक्के एवढे झाले आहे.
४ लाख ९४ हजार ०३२ अॅक्टिव्ह रुग्ण
शनिवारी राज्यात ३४ हजार ८४८ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५३ लाख ४४ हजार ०६३ वर पोहोचली असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ लाख ९४ हजार ०३२ झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,०८,३९,४०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३,४४,०६३ (१७.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३४,४७,६५३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून २८,७२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.