राज्यात एकीकडे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे मात्र कोरोना लसीकरणावरून राजकारण सुरु झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारमधील मंत्री केंद्राकडे सतत कोरोना लसीचा साठा वाढवून द्यावा अशी मागणी करत आहेत. तर केंद्र महाराष्ट्राला इतर राज्यापेक्षा सर्वाधिक लस पुरवल्याचा दावा करत आहे. यात महाराष्ट्रातील काही मंत्र्यांनी केंद्र लसीकरणावरून महाराष्ट्राशी भेदभाव करत असल्याचा दावा केला. त्यामुळे लस पुरवठ्याचा मुद्द्यावरून राज्य सरकारविरुद्ध केंद्र सरकार असा वाद रंगू लागला आहे.
यावर सरकारमधील मंत्री जयंत पाटील, रोहित पवार, नाना पटोले यांनी केंद्राने अधिक लसीचा पुरवठा करावा अशी मागणी केली आहे. तर विरोधी पक्षातील भाजपा नेते यावर उत्तर देत सरकारमधील मंत्री देंवेद्र फडणवीस, प्रकाश जावडेकर, प्रविण दरेकर, चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारने लसीकरणावरून राजकारण थांबा अशी मागणी केली आहे. त्यामुळे ट्विटवर सध्य़ा केंद्र विरुद्ध राज्य सरकार आणि भाजपाविरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा वाद पाहायला मिळतो.
यातच काल केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन जाधव यांनी लसीकरणावरून केलेल्या आरोपांमुळे राजकारण अधिक तापले आहे. यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज ट्विट करत हर्षवर्धन जाधव यांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त करत केंद्राकडून लसीची मागणी केली आहे.
नाहीतरी सध्या काही राज्यात निवडणूक सुरू असल्याने त्या संपेपर्यंत तिथला कोरोना शांत बसला आहे. त्यामुळं तिथं लसीची तेवढी गरज नाही. तोपर्यंत तरी देशाचा मोठा आर्थिक डोलारा सांभाळत असलेल्या महाराष्ट्राला केंद्रीय आरोग्यमंत्री @drharshvardhan साहेबांनी लसींचा पूर्ण साठा पाठवून द्यावा. pic.twitter.com/5KzHnOl9Hs
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 8, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही लस पुरवठ्यावरून केंद्रावर तोफ डागत अधिक लसीची मागणी केली आहे.
कदाचित केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची पूर्ण माहिती नाही किंवा त्यांना अपूर्ण माहिती दिली गेली. महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्ण संख्या, किती लसी उपलब्ध झाल्या या प्रश्नांची शहानिशा करण्याआधी परिपत्रक काढून राज्याला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत का अशी मनात शंका आहे
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 8, 2021
देशात रुग्णांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात असताना सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळायला हव्यात. मात्र तसे मुद्दाम होऊ दिले जात नाही आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसते.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 8, 2021
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत भाजपसह मोदी सरकारवर लसीकरणावरून जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
LIVE: प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले यांची पत्रकार परिषद https://t.co/DTKXeyS4Sb
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 8, 2021
दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सरकार लसीकरण केंद्र बंद करत केंद्राविरुद्ध चुकीची माहिती पसरवत असल्याचा दावा केला.
महाराष्ट्राला 1.06 कोटी लस प्राप्त झाल्या.
तसे ट्विट डीजीआयपीआरने 6 एप्रिल रोजी केले आहे.
91 लाख लसी वापरल्या.
म्हणजे 15 लाख लस शिल्लक आहेत.
मग, आज जाणिवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबत चुकीच्या बातम्या पसरविण्याचे कारण काय❓
(2/n) #MaharashtraHasVaccines pic.twitter.com/BA4MMK2t1S— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 8, 2021
दरम्यान विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही लसीकरणावरून महाराष्ट्र सरकारावर टीका केली आहे.
राज्यातील लसीकरण मोहीम जलदगतीने राबविण्यासाठी आम्ही @CMOMaharashtra च्या सोबत आहोत. यासाठी केंद्र सरकारकडे आमची देखील आग्रही मागणी आहे. @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/QRi42OvoRW
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) April 6, 2021
दरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Press Conference at @BJP4India HQ https://t.co/C3fppvk4FC
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) April 8, 2021
दरम्यान भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जाहीर पत्रकार परिषदेत राज्यात लसीकरणावरून राजकारण सुरु आहे असा आरोप केला.
कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोर करण्याच्या नावाखाली अघोषित लॉकडाऊन लावून गोरगरिबांच्या पोटावर लाथ मारणाऱ्या या लबाड सरकारचा जाहीर निषेध ! @OfficeofUT pic.twitter.com/UkEYYEOSHT
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 7, 2021