मुंबईसह राज्यभरात शासकीय यंत्रणा लॉकडाऊनच्या परिस्थितीसाठी कामाला लागलेल्या असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने Lockdown कालावधीतील आर्थिक मुद्द्यावर नेमक बोट ठेवले आहे. लॉकडाऊनची झळ ही सर्वसामान्य आणि गरीबांनाच बसते आहे. हातावरच पोट असणाऱ्यांचा मुद्दा मनसेने लॉकडाऊनच्या निमित्ताने उपस्थित केला आहे. आर्थिक अडचणीमुळे गरीबांवर ओढावणाऱ्या संकटाचा मुद्दाही मनसेने मांडला आहे. त्यासोबतच बेरोजगारीचा विषयही मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे. लॉकडाऊन खुशाल करा पण त्याचवेळी सामान्य आणि गरीब कुटूंबाला २० हजार रूपये द्या अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. भाजप सरकारने देशभरात राबवलेल्या वेगवेगळ्या कॅम्पेनचा समाचारही मनसेकडून घेण्यात आला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावर सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
लॉक डाउन से डर नही लगता है, गरिबी से लगता है
मागील वर्षभर आपण सर्वच जण अनेक प्रकारच्या अडचणी ना सामोरे जात आहोत. पण खरी अडचण होते ती गरीब लोकांची , ज्यांना रोज काम केल्याशिवाय पर्याय नाही. जनतेने मागील वर्षात सरकार चे निर्देश कडकपणे पाळले, थाळ्या हि वाजवल्या व “कोमट पाणी” हि
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) March 30, 2021
तर सर्व सामान्य जनतेला. आधीच लाखो लोक बेरोजगार झाले आहेत, आता लोक हा आर्थिक ताण अजिबात सहन करू शकत नाही.
सरकार ने खुशाल लॉक डाउन करावे पण सामान्य व गरीब परिवाराला रोख 20000 रुपये द्यावे व मग लावा कि लॉक डाउन.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) March 30, 2021