महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच मंगळवारी रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, बुधवारी पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला. मागील २४ तासांत राज्यात ३९ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मंगळवारी २७ हजार ९१८ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. परंतु, बुधवारी हा आकडा जवळपास दोन हजारांनी वाढला. तसेच बुधवारी २३ हजार ६०० रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण २४,००,७२७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८५.३४ टक्के इतके आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९७,९२,१४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २८,१२,९८० (१४.२१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७,२९,८१६ व्यक्ती होम क्वारंटाईन, तर १७,८६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Maharashtra reports 39,544 new #COVID19 cases, 23,600 discharges and 227 deaths in the last 24 hours.
Total cases 28,12,980
Total recoveries 24,00,727
Death toll 54,649Active cases 3,56,243 pic.twitter.com/mCgf0QK8xT
— ANI (@ANI) March 31, 2021
२२७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
राज्यात मागील काही दिवसांत कोरोनाबाधित मृतांची संख्या वाढताना दिसत आहे. मंगळवारी १३९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. बुधवारी हा आकडा तब्बल २०० पार गेला. मागील २४ तासांत २२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्युदर १.९४ टक्के इतका आहे. तसेच मुंबईमध्ये मागील २४ तासांत ५३९९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत एकूण मृतांची संख्या ११ हजार ६८६ इतकी झाली आहे.