घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकॅप्टन बनवा किंवा उप कॅप्टन मी टिम जिंकण्यासाठीच प्रयत्न करतो : रोहित...

कॅप्टन बनवा किंवा उप कॅप्टन मी टिम जिंकण्यासाठीच प्रयत्न करतो : रोहित पवार

Subscribe

नाशिक : तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्रात पहिला बदल काय करणार असा प्रश्न आमदार रोहित पवारांना विचारला असता, मी एक पॅशनेट व्यक्ती असून मी जे काही करतो मनापासून करतो. खेळायला लागलो तर मनापासून खेळतो, मला क्रिकेट खेळायला आवडते. मग मला कॅप्टन बनवा किंवा व्हाईस कॅप्टन बनवा किंवा ओपनिंगला उतरावा किंवा शेवटी उतरवा पण टीम जिंकण्यासाठीच प्रयत्नरत असतो असे खणखणीत उत्तर देत रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली.

महाराष्ट्र व्हिजन फोरम या युवाकेंद्रित उपक्रमांतर्गत मविप्र समाजाच्या रावसाहेब थोरात सभागृहात रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यज्ञथ्यय्रंच्या महाराष्ट्र विकासाच्या संकल्पना समजून घेउन त्यांच्या अपेक्षाही जाणून घेतल्या.यावेळी एका विद्यार्थ्याने आपण मुख्यमंत्री झालात तर पहिला बदल काय कराल असा प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देतांना पवार म्हणाले, बिजनेस म्हणा किंवा राजकारण करतो ते मनापासून करतो. मी कोणत्याही पदासाठी काम करत नाही. महाराष्ट्रामध्ये विकासाचा समतोल ठेवण्यासाठी प्रत्येक युवाला विविध क्षेत्रात संधी देण्यासाठी योग्य धोरण कसं आखता येईल, यासाठी प्रयत्नशील राहू. आपल्या सर्वांचा वापर जसा केला जातो, तसं न होऊ देता आपल्या सर्वांची एका सकारात्मक दृष्टिकोनातून योग्य दिशेने कशी नेता येईल यासाठी उपाययोजना करता येईल. 2014 आणि 19 मध्ये तरुण आमदारांची संख्या घटली आहे. लोकसभेमध्ये सुद्धा घटली. आज खूप प्रश्न आहेत.. अनेक पॉलिसी आपल्याला राबवायचा आहेत, बदल घडवणे तुमच्या हातात आहे, ते तुम्ही लोकशाही मार्गाने मतदानाच्या माध्यमातून करा, असे आवाहन यावेळी उपस्थित युवा वर्गाला पवार यांनी केले.

- Advertisement -
धोरण ठरविण्यात युवकांचा सहभाग अत्यल्प

राज्यातील सुमारे साठ टक्के लोकसंख्या चाळीस वर्षांखालील असली तरी सार्वजनिक धोरण यंत्रणेत युवकांचा सहभाग अत्यल्प आहे. चाळीस वर्षांखाली खासदार आणि आमदारांचे प्रतिनिधित्व हा विषय आहे. तरुणांसाठी असे कोणतेही व्यासपीठ नाही, जिथे शासन आणि धोरण निर्मिती प्रक्रियेत युवा वर्ग उपयुक्त योगदान देऊ शकेल. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र व्हिजन फोरमची स्थापना करण्यात आली आहे. युवकांनी प्राधान्यक्रमाने केलेल्या सूचना राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचविल्या जातील आणि शाश्वत विकास योग्य कार्यक्रम पत्रिका तयार केली जाईल, असे पवार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -