घरउत्तर महाराष्ट्रहोळी करा लहान, पोळी करा दान; महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे आवाहन

होळी करा लहान, पोळी करा दान; महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे आवाहन

Subscribe

नाशिक : पर्यावरणाचे संतुलन अबाधित राहावे याकरीता महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ ह्या उपक्रमांतर्गत नाशिक शहरातून पुरणपोळी तसेच खाद्यपदार्थ होळीत न टाकता त्यांचे दान करावे , असे नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे. होळीच्या ठिकाणी संकलित झालेल्या पुरणपोळ्यांचे गरजू आणि गरीब कुटुंब,अनाथाश्रम,

वृद्धाश्रमामध्ये वाटप करून त्यांच्या पोटातील भुकेची आग शमविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अलीकडच्या काळात जवळपास सर्वच धर्मियांचे सण- उत्सव हे निसर्गाला ओरबाडूनच साजरे केले जात असल्याचे चित्र गडद होताना दिसते. त्यामुळे निसर्गचक्र विस्कळीत होऊन एकूणच जीवसृष्टीला धोका निर्माण होत असल्याचे अनेक स्पष्ट संकेत मधून मधून अनुभवायला मिळतात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा धोका वेळीच ओळखून, मागील तीस वर्षांपासून महाराष्ट्रात सर्वच सण – उत्सव हे पर्यावरणपूरक साजरे करण्यासाठी कृतिशील प्रबोधनाचे काम हाती घेतलेले आहे. विशेषतः शाळा महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांकडून फटाके मुक्त दिवाळी, पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याबद्दलचे संकल्प पत्र स्वेच्छेने भरून घेतले जातात. ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ ह्या उपक्रमांतर्गत नाशिक शहरातून पुरणपोळी तसेच खाद्यपदार्थ होळीत न टाकता त्यांचे दान करावे , असे नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

माणसातील दुर्गुणांची होळी करावी, असा नितीयुक्त संदेश देणारा होळीचा सण मात्र आजही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकूड, गोवर्‍या जाळून चढाओढीने साजरा केला जातो. प्रत्यक्ष होळी पेटली असताना , होळीत नारळ, खोबरे व पुरणपोळी असे खाद्यपदार्थ टाकून जाळले जातात. होळी जवळच अर्वाच्य शब्दात बोंबा मारल्या जातात. होळी नंतर येणारा रंगपंचमी हा सणही प्रचंड पाण्याची नासाडी करणारा असून, रासायनिक रंगाने रंगपंचमी खेळली जाते. त्यामुळे पाण्याचा अनाठाई अपव्यय तर होतोच शिवाय रासायनिक रंगामुळे त्वचेला आणि डोळ्याला गंभीर इजा होण्याचा मोठा धोकाही असतो. म्हणून एका गावात, कॉलनीत,गल्लीत एकच लहान, प्रतिकात्मक होळी करावी, होळीसाठी लाकूड , गोवर्‍या जाळू नयेत. पुरणपोळी, नारळ, खोबरे असे खाद्यपदार्थ होळीत टाकण्याऐवजी त्यांचे गरजू व गरीब कुटुंबांमध्ये मध्ये वाटप करावे. असे आवाहन अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे , नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड समीर शिंदे, जिल्हा प्रधान सचिव नितीन बागुल,महेंद्र दातरंगे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -