घरमहाराष्ट्रमनसुख हिरेन हत्येचा गुंता सुटला!

मनसुख हिरेन हत्येचा गुंता सुटला!

Subscribe

पोलीस उपमहानिरीक्षक शिवदीप लांडेंची पोस्ट

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणार्‍या मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. तशी माहिती खुद्द एटीएसचे पोलीस उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांनी दिली आहे. लांडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी सॅल्यूट ठोकणारा एक फोटो टाकला आहे. तर अतिसंवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अतिसंवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मी आमच्या संपूर्ण एटीएस पोलीस फोर्समधील सहकार्‍यांना सॅल्यूट करतो. ज्यांनी गेल्या काही दिवसांत रात्रं-दिवस एक केला आहे. त्यामुळे या केसमध्ये न्यायपूर्ण परिणाम समोर आला आहे. ही केस माझ्या संपूर्ण पोलीस करिअरमधील सर्वात जटील केसमधील एक आहे, असे शिवदीप लांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसच्या टीमने 2 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना दुपारी कोर्टात हजर केले. त्यावेळी कोर्टाने दोन्ही आरोपींची 30 मार्चपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी शनिवारी एटीएसने सचिन वाझे यांचीही कोठडी मागितली होती. त्यावर कोर्टाने म्हटलेय की, वाझेची कोठडी 25 मार्चनंतर मिळेल.

- Advertisement -

मनसुख हिरेन प्रकरणात एटीएसने एक बुकी आणि एका पोलीस कर्मचार्‍याला अटक केली आहे. नरेश गारे असे अटक करण्यात आलेल्या बुकीचे नाव आहे. तर विनायक शिंदे हा मुंबई पोलिसांतील माजी कॉन्स्टेबल असलेल्या आरोपीला अटक केली आहे. विनायक शिंदे हा लखन भैया एन्काऊंटर प्रकरणातील दोषी आहे. तो सध्या पॅरोलवर बाहेर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -