भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. दरवर्षी अंदमानमध्ये २२ मे पर्यंत मान्सून दाखल होतो. पण यंदा . १३ ते १९ मे दरम्यान मान्सूनला सुरुवात होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. केरळमध्ये २० ते २६ मेपर्यंत पाऊस दाखल होईल. तर तळकोकणात २७ मे ते २ जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुखे कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत मान्सूनच्या आगमनाबाबत माहिती दिली आहे.
हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांच्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. पाऊस सुरु होण्याची तारीख हवामान विभागाकडून १५ रोजी जाहीर होणार करण्यात येईल. अंदमानानमध्ये पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार आहे. त्यानंतर अरबी समुद्रावर दुसऱ्या आठवड्यात पाऊस सुरू होईल आणि त्यानंतर भारतात पुढील आठवड्यात मान्सून दाखल होईल, असे होसाळीकर यांनी म्हटले आहे.
आयएमडीचा येत्या 04 आठवड्यांत पावसाचा अंदाज;
आठवडा 1: अंदमान समुद्रावर वर्धित पावसाची शक्यता.
आठवडा 2 आणि 3 :अरबी समुद्रावरील वर्धित पावसाची शक्यता दर्शवते.
दुसरा आठवडा आणि त्यापुढील आठवड्यात दक्षिण द्वीपकल्प आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता . https://t.co/usAqxcEsar— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 12, 2022
दरम्यान, असनी चक्रीवादळाचा मार्ग बदलला असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. तर चक्रीवादळामुळे हवामान विभागाने आंध्रप्रदेशातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे. चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. वादळामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रात गुरूवारी मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारीही ही राज्यात अनेक भागांत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.