घरताज्या घडामोडी...तर आमचं काय होईल, हाच विचार पिडतोय तुम्हाला; केसरकरांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

…तर आमचं काय होईल, हाच विचार पिडतोय तुम्हाला; केसरकरांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

Subscribe

मुंबईतील रस्त्याच्या कंत्राटावरून शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांच्या कंत्राटावरून राज्य सरकारवर टीका केली. त्यावर आज राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबईतील रस्त्याच्या कंत्राटावरून शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांच्या कंत्राटावरून राज्य सरकारवर टीका केली. त्यावर आज राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मुंबई खड्डेमुक्त झाली तर आमचं काय होणार. मुंबईत चांगले दवाखाने होत आहेत. ते झाले तर आमचं काय होणार. मुंबईत चांगले सौदर्यीकरण होत आहे. मुंबईतील जीवन बदलत आहे, तर आमचं काय होणार. हा विचार तुम्हाला पिळतोय. म्हणून तुमची ही आदळ आपट चालली आहे”, असे अनेक सवाल उपस्थित करत दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. (Minister Deepak Kesarkar Slams Aaditya Thackeray)

आदित्य ठाकरे यांनी काल केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी आज दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी अनेक सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. “कोस्टल रोडवर मार्केट रेटच्या बरोबर रेट आणले, १२ टक्के जास्त झाले. त्यावेळी तुम्हाला हे कळलं नाही. त्याठिकाणी दर्जेदार काम व्हावे म्हणून निर्णय घेतला आहे. सगळ्यात चांगल्या एजंसीला काम दिले. देशात सर्वोत्कृष्ट काम त्यांनी केलेली आहेत. अशाच लोकांची स्पर्धा होती. बराच वेळ ही स्पर्धा चालली. तेथे कोणीही सहभागी होऊ शकत होते. त्यामुळे ही कामे होऊन मुंबई खड्डेमुक्त झाली तर आमचे काय होणार? मुंबईत चांगले दवाखाने होत आहेत. ते झाले तर आमचे काय होणार? मुंबईत चांगले सौदर्यीकरण होत आहे. मुंबईतील जीवन बदलत आहे, तर आमचं काय होणार? असे विचार तुम्हाला पिडत आहेत. म्हणून तुमची ही आदळ आपट चालली आहे”, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.

- Advertisement -

“ठाकरे गटाने ग्रामपंचायतीपासून धसका घेतला आहे. ग्रामपंचायतीमध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. पहिल्या क्रमांकावर भाजप आली. दुसऱ्या क्रमांकावर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि नंतर उद्धव ठाकरे (उबाठा) यांनी शिवसेना होती. उबाठा सेना होती. वेगवेगळ्या ठिकाणी सोयरिक शोधले जात आहेत. अनेक लोकांशी सोयरिक करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ते चिंतेत आले असतील. त्यामुळं यांना घाई झाली असेल. निवडणुका लवकर घ्या, असं त्यांना वाटत असेल”, असेही दीपक केसरकर यावेळी म्हणाले.

याशिवाय, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात. तेव्हा मुंबईची जनता त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असते. मोठे-मोठे प्रकल्पांचे मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. हा मुंबईकरांचा कार्यक्रम आहे. मोठ्या प्रमाणात मुंबईकर येतील. लोकांना दिलासा देणारा हा कार्यक्रम आहे. अनेक मोठ्या प्रकल्पांची उद्धाटने, भूमिपूजनं होणार आहेत. काहीही केले तरी आम्ही ते ठरविले होते. पण, आम्ही ते करू शकलो नाही. 4-5 महिन्यात कोणी काही करत असेल, तर त्यामागे मेहनत असते. ती मेहनत कोणीतरी करते. याबद्दल कोणीही पोटदुखी करून घेऊ नये”, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – लोक माझे फोटो काढतात… पोलिसांत जबाब नोंदवताना उर्फीचा माध्यमांवर ठपका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -