घरठाणेआमच्या ३२ वर्षीय नेत्याला महाराष्ट्रातून निमंत्रण, पण तुमच्या नेत्याचं काय?, भास्कर जाधवांचा...

आमच्या ३२ वर्षीय नेत्याला महाराष्ट्रातून निमंत्रण, पण तुमच्या नेत्याचं काय?, भास्कर जाधवांचा महाजनांना टोला

Subscribe

ठाण्यात ठाकरे गटाच्यावतीने शिवगर्जना हा मेळावा घेऊन आज ठाकरे गटातील नेत्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. यावेळी ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणातून मनसे नेते प्रकाश महाजन यांच्यावर टीका केली आहे. मी सभागृहात या सरकारला उघडं पाडणार आहे. प्रकाश महाजन हे प्रमोद महाजन यांचे भाऊ आहेत म्हणून लोक त्यांना थोडं आदर देत आहेत. त्यांनी विचार करावा की, त्यांच्या पक्षातील ३२ वर्षांच्या नेत्याला महाराष्ट्रात किती ठिकाणी बोलावतात आणि आमच्या नेत्याला महाराष्ट्रातून किती ठिकाणी बोलावतात, असं म्हणत आमदार भास्कर जाधव यांनी प्रकाश महाजनांना टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते प्रकाश महाजन?

- Advertisement -

आदित्य ठाकरे प्रत्येक सभेत बोलत असताना ३२ वर्षाच्या नेत्याला घाबरले असे सांगतात. तू ३२ वर्षांचा झाला असल्यास तुझ्या आई-वडीलांना लग्न लावून द्यायला सांग. लग्न लावले नसल्यामुळे माणसाची गडबड होते. आमचं लग्न झाल्यामुळे आम्हाला घरचा धाक असतो. पण याला काहीच धाक नाही. ती दिशा गेली पटण्याला ती परत आलीच नाही, असं मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले.

दरम्यान, प्रकाश महाजन यांच्या या वक्तव्यावर भास्कर जाधव यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच ठाकरे गटाचे नेते राजन विचारे, अरविंद सावंत, केदार दिघे यांनी देखील शिंदे गटावर टीका केली आहे.

- Advertisement -

राजन विचारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची स्थापना होऊन ५७ वर्ष झाली. १९६७ साली शिवसेनेची पहिली सत्ता कुठे आली असेल तर ती याच ठाण्यात आली. आजवर ठाण्यातील असंख्य नेत्यांनी शिवसेनेला साथ दिली. अनेक नेत्यांनी जीवाचं रान करुन ही संघटना उभी केली. पण काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थाकरीता संघटना विकायला काढली, असं म्हणत खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.


हेही वाचा : सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींवर ठाकरे बोलणार का?, देवेंद्र फडणवीसांचा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -