आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आहेत. त्याच संदर्भांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनासुद्धा टोला लगावला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुमी खर्गे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘रावण’ असा केल आहे. यावरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कोणाच्या बोलण्याने कोण रावण होत नाही. देशातील जनता नरेंद्र मोदींना त्यांचा ‘मसीहा’ मानतात आणि जी व्यक्ती गरिबांचा मसीहा आहे त्या व्यक्तीला काही लोक अपशब्द वापरतात. असा प्रयत्न आधीसुद्धा करण्यात आला होता. जेव्हा मोदींना कोणी काही बोलण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. असे फडणवीस म्हणाले. मोदींना जेवढे अपशब्द बोलणार तेवढेच हे लोक खाली जाणार कारण मोदींना काही बोललेलं जनतेला आवडलेलं नाही. असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल जे विधान केले त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया देत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विधानाचा निषेध केला आहे.
हे ही वाचा – राज्यातील 2386 गावांमध्ये बीएसएनएलचे टॉवर उभारणार; मंत्रिमंडळ बैठकीतील 11 महत्त्वाचे निर्णय