घरताज्या घडामोडीआव्हाडांच्या बॉडीगार्डची आत्महत्या नव्हे तर... मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप

आव्हाडांच्या बॉडीगार्डची आत्महत्या नव्हे तर… मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप

Subscribe

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी माफीचा साक्षीदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे माजी अंगरक्षक वैभव कदम यांनी आत्महत्या केली आहे. परंतु ही आत्महत्या नसून खून आहे, असा गंभीर आरोप भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.

मोहित कंजोब यांनी ट्विट करत एका व्हिडीओच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत. जितेंद्र आव्हाड यांचा अंगरक्षक आणि मुंबई राखीव पोलीस दलातील कर्मचारी वैभव कदम याने आत्महत्या केली आहे. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं कंबोज यांनी म्हटलं आहे. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, या प्रकरणी तात्काळ तक्रार दाखल करण्यात यावी. जे पोलीस जनतेची सेवा करतात. जर तेच सुरक्षित नसतील किंवा त्यांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय?, असा सवाल मोहित कंबोज यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

वैभव कदम हे जितेंद्र आव्हाडांचे सुरक्षारक्षक होते. एवढ्या मोठ्या हायप्रोफाईल प्रकरणातल्या आरोपीचा असा संशयास्पद मृत्यू होतो. राज्यात अजून एक मनसुख हिरेन आणि सुशांत सिंग राजपूत सारखं प्रकरण झालंय, असा आरोप कंबोज यांनी केला आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात राहणारे अभियंता अनंत करमुसे यांनी ५ एप्रिल २०२० रोजी ठाकरे सरकारमधील तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह टीप्पणी केली होती. या रागातुन आव्हाड यांचे अंगरक्षक वैभव कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी करमुसे यांना घरातुन उचलुन आव्हाड यांच्या नाद बंगल्यावर घेऊन गेले. त्यावेळी त्यांनी करमुसे यांना बेदम मारहाण केली.

याप्रकरणी वर्तकनगर पोलीसांनी गुन्हा दाखल करून, आव्हाड यांच्या अंगरक्षकासह सहा कार्यकर्त्यांना अटक केली होती. यातील तिघाही पोलिसांची विभागीय चौकशी केली; मात्र, पोलिसांनी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या बडग्याने तब्बल दीड वर्षानंतर १४ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी वर्तकनगर पोलिसांनी आव्हाड यांना छोट्या प्रकरणांमध्ये अटक करून तात्काळ त्यांची जामिनावर मुक्तता केली होती.

या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात वैभव कदम याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविली होती. महत्त्वाचे म्हणजे करमुसे प्रकरणात कदम यांचीही आरोपी म्हणून चौकशी सुरु होती.


हेही वाचा : आमदार जितेंद्र आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाच्या आत्महत्येने करमुसे प्रकरणाला नवे वळण?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -