खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ३ मे नंतर आपली दिशी वेगळी असेल, असं मोठं विधान त्यांनी केलं आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं. मतदानानंतर संभाजीराजे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ३ मे नंतर माझी राजकीय दिशा स्पष्ट करणार असून ती नक्की वेगळी असेल असं जाहीर केलं.
३ मे रोजी संभाजीराजेंची खासदारकीची मुदत संपत आहे. त्यामुळे ३ मे नंतर राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. संभाजीराजेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
संभाजीराजे छत्रपती हे राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त खासदार आहेत. त्यांच्या खासदारकीचा कार्यकाळ आता संपतो आहे. वेट अँड वॉच आहे…३ मे रोजी माझी मुदत संपत आहे. निश्चित वेगळी दिशा असणार यामध्ये काही दुमत नाही. पण काय दिशा असणार आहे, त्यासाठी वाट पाहूयात. ३ मे नंतर आपण पुन्हा एकदा बोलू, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
हेही वाचा : मैदान हे मैदानच राहिलं पाहीजे, RRS च्या ‘त्या’ पत्रावर किशोरी पेडणेकरांनी दिली प्रतिक्रिया