Homeमहाराष्ट्रST Fare Hike : सर्वसामान्यांना मोठी झळ! लालपरीचा प्रवास महागला, रिक्षा आणि...

ST Fare Hike : सर्वसामान्यांना मोठी झळ! लालपरीचा प्रवास महागला, रिक्षा आणि टॅक्सीचीही भाडेवाढ

Subscribe

MSRTC fare hike : एसटीनं दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्यांना झटका बसला आहे.

मुंबई : सर्वसामान्यांसाठी हक्काचे साधन ओळखले जाणाऱ्या एसटी महामंडळानं भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. एसटी महामंडळाने हा निर्णय घेतल्यामुळे तिकीट दरात 14.97 टक्के वाढ होणार आहे. ही दरवाढ आजपासून ( 24 जानेवारी ) लागू होईल.

एसटीसोबत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही मान्यता दिली आहे. त्यामुळे दोन्ही वाहनांच्या दरात 3 रूपयांची वाढ होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.

हेही वाचा : कुडाळमध्ये ठाकरेंना धक्का! नगरपंचायतीवर भाजपने फडकविला झेंडा; एका नगरसेविकेने गेम केला

“लालपरीचे भविष्य अंधांतरी होते. हे वाटत असताना दररोज तीन कोटी रूपयांचे नुकसान होत होते. ते दरवाढीमुळे कुठेतरी कमी होईल,” अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

प्रताप सरनाईक म्हणाले, “प्राधिकरणाची बैठक मंत्रालयात पार पडली. त्यात लोकप्रतिनिधींचा समावेश नसतो. गृह, परिवहन आणि अर्थ खात्याचे प्रधान सचिव बैठक आयोजित करतात. या बैठकीत एसटीची भाडेवाढ 14.97 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय झाला. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ 1 फेब्रुवारीपासून होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाड 3 रूपायांनी झाली आहे.”

“डिझेल, सीएनजीचे दर वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्षी भाडेवाढ अपेक्षित असते. तीन चार वर्षांपासून भाडेवाढ झाली नसल्यानं एकत्रितपणे 14.97 टक्के भाडेवाढ आजपासून लागू होईल,” असं सरनाईक यांनी म्हटलं.

“भाडेवाढीमुळे सर्वसामान्य लोकांचे बजेट कोलमडणार आहे, हे मान्य आहे. पण, एसटी महामंडळाची स्थिती चांगली नाही. एसटीच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. एसटीचे दिवसाला तीन कोटी रूपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे भाडेवाढ अपरिहार्य आहे. प्रवाशांना चांगली सेवा द्यायची असेल, तर या गोष्टीची भविष्यात गरज पडणार आहे. डिझेलचे दर वाढत आहेत. मेंटनन्सचा खर्च अधिक येतो,” अशी माहिती सरनाईक यांनी दिली.

“लाडक्या बहिणींना तिकीट दरात 50 टक्क्यांची सवलत दिली आहे. त्यामुळे एसटीचं उत्पन्न वाढलं आहे. 75 वर्षांवरील वृद्धांना शासनानं मदत करणे आवश्यक आहे,” असेही सरनाईक यांनी सांगितलं.

हेही वाचा : 16 जानेवारीच्या रात्री काय घडलेलं? सैफन दिली खडान-खडा माहिती; म्हणाला, हल्लेखोरानं…