घरमहाराष्ट्रकोरोना रोखण्यासाठी मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल नागपुरात; दिल्या महत्वाच्या सूचना

कोरोना रोखण्यासाठी मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल नागपुरात; दिल्या महत्वाच्या सूचना

Subscribe

नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. नागपुरातील कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल नागपुरात दाखल झाले आहेत. इक्बाल सिंह चहल यांच्या नेतृत्वात दाखल झालेल्या उच्च स्तरीय तज्ज्ञ समितीने नागपूरच्या स्थितीचा अभ्यास करत अत्यंत महत्वाच्या सूचना केल्या आहेत. यासह नागपुरात नियंत्रणात असलेली स्थिती हाताबाहेर का गेली याची कारणमीमांसा ही त्यांनी केली आहे.

नागपुरात गेल्या काही आठवड्यापासून कोरोना प्रादुर्भावचा वेग वाढला आहे. काही महिन्यांपूर्वी नागपुरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशपातळीवर आदर्श मानला जात होता. मात्र, आता त्याच नागपुरात गेले १० ते १५ दिवस रोज हजारो कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. तर दररोज ४० ते ५० रुग्णांचा मृत्यूही होत आहे. त्यामुळे गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकाराने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांच्या नेतृत्वात ५ सदस्यीय उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीने नागपूरचा दौरा केला. इथल्या प्रशासनाशी बोलून नागपूरच्या स्थितीचा अभ्यास करत काही सूचना केल्या आहेत. यावेळी कोरोना विरोधातला लढा अधिकाऱ्यांच्या इगोमुळे विभागला गेल्याचं या समितीने म्हटलं. अधिकाऱ्यांनी इगो बाजूला ठेऊन एकत्र येऊन नागपूरची कोरोना विरोधातली लढाई बळकट करावी अशी सूचना ही केली. इक्बाल चहल यांच्या सोबत या उच्च स्तरीय पथकात डॉ. हेमंत शहा, डॉ. राहुल पंडित, डॉ. मुजल लकडावाला, डॉ. गौरव चतुर्वेदी यांचा ही सहभाग होता.

- Advertisement -

इक्बाल सिंह चहल समितीने केलेल्या सूचना

  • कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चाचण्या वाढवा.
  • सर्व प्रकारच्या चाचण्यांचे अहवाल २४ तासांच्या आत प्राप्त झाले पाहिजे.
  • रुग्णालय, एम्ब्युलन्स सेवा आणि रुग्णांचे व्यवस्थापन यावर लक्ष द्यावं. शिवाय, रुग्णांना खाटा उपलब्ध होत आहे की नाही यावर काटेकोरपणे लक्ष देणे.
  • रुग्णालयातील काही खाटा संशयित रुग्णांसाठी त्वरित उपलब्ध होतील अशी सोय करुन ठेवावी.
  • रुग्णालयात किती खाटा आहेत, त्यापैकी किती रिकाम्या आहेत यावर नजर ठेवणारं डॅशबोर्ड तयार करावं, ते दर अर्धा तासांनी अपडेट करावं.
  • वरिष्ठ अधिकाऱ्यानी स्वतः कोरोनाचा संसर्ग असलेल्या वस्त्यांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन परिस्थिती जाणून घ्यावी.
  • ज्या रुग्णांच्या घरी वेगळं स्वच्छता गृह नाही, घरात जागा कमी असेल तर त्यांच्या कुटुंबियांना क्वारंटाईन करावं.
  • महापालिकेच्या प्रत्येक झोन स्तरावर वॉर रूम उभारण्यात यावेत.
  • सोशल मीडियावर आणि अन्य माध्यमात येणाऱ्या चुकीच्या पोस्ट, बातम्यांचे खंडन करावं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -