घरताज्या घडामोडीएकतर्फी प्रेमातून विवाहितेची हत्या तर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

एकतर्फी प्रेमातून विवाहितेची हत्या तर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

जालना जिल्ह्यातील मंठा येथे पाच दिवसांपूर्वी एका विवाह झालेल्या महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.

दिवसेंदिवस एकतर्फी प्रेमातून घडणाऱ्या विकृत घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील महिलांचा सुरक्षेचा प्रश्न सातत्यानं उपस्थित होत आहे. नुकतीच जालनामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील मंठा येथे पाच दिवसांपूर्वी एका विवाह झालेल्या महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. वैष्णवी इंगळे (१९) असे या मृत तरुणीचे नाव आहे.

नेमके काय घडले?

जालना जिल्ह्यातील मंठा शहरातील बाजार पट्ट्यात मृत तरुणी आपल्या मैत्रिणीसह खरेदीसाठी बाजारात गेली होती. त्या दरम्यान, आरोपी शेतामध्ये साधारण चार वाजण्याच्या सुमारास दबा धरुन बसला होता. त्याचवेळी आरोपीने धारदार चाकूने हल्ला करत तरुणीचा गळा चिरला. बेसावध असलेली तरुणी जागीच कोसळली. त्यानंतर मैत्रिणीने मदतीसाठी आरडाओरड केला. दरम्यान, तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; मृत तरुणीचे ५ दिवसांपूर्वी जालन्यातील एका तरुणाबरोबर विवाह झाला होता. मांडव परतणीसाठी ही तरुणी दोन दिवसांपूर्वीच माहेरी आली होती. मंगळवारी तरुणी आपली आई आणि मैत्रिणीसोबत खरेदीसाठी बाजारात आली होती. मात्र काही वेळाने तिच्यासोबत असलेली आई परत घरी गेली होती. हिच संधी साधत आरोपीने तरुणीचा काटा काढण्याचे ठरवले आणि धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला.

प्रत्यक्षदर्शींच्या महितीनुसार, मृत तरुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तिच्याच घराजवळ राहणाऱ्या शेख अल्ताफ शेख बाबू या २६ वर्षाच्या तरुणाचे नाव पुढे आले. तसेच आता आपण पकडले जाणार असल्याच्या भीतीने त्यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याच्यावर जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची तब्येत स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल रखुमाईची महापूजा; विठ्ठल बडेंना पूजेचा मान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -