राज्यातील नगर पंचायत निवडणुकीचा बुधवारी निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपचे मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडून आले आहेत. भाजप सदस्यसंख्येत क्रमांक एकचा पक्ष झाला आहे. एकूण ४१५ जागांवर भाजपचे सदस्य निवडून आले आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप निवडणूक जिंकत महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. जास्त नगरपंचायती मिळाल्या नसल्या तरी महाविकास आघाडीला चांगलीच लढत भाजपकडून देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केलं आहे. तसेच मतदारांचे आभार मानले आहेत. दरम्यान महाविकास आघाडीवर चांगलाच निशाणा फडणवीसांनी साधला आहे.
राज्यातील नगरपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. या निकालानंतर नगरपंचायतींमध्ये क्रमांक २ चा पक्ष भाजप झाला आहे. भाजपला एकूण २२ नगरपंचायती मिळाल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. फडणीसांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. मविआ सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता आणि राहिल असे फडणवीस यांनी म्हटलं आहे.
भाजपाच्या 24 आणि सहयोगी मिळून सर्वाधिक 30 नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली. सदस्यसंख्येत सुद्धा सर्वाधिक 415 हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या या दणदणीत यशाचे शिल्पकार आपले सारे कठोर परिश्रमी कार्यकर्ते आहेत. या सर्वांचे फडणवीसांनी अभिनंदन केले आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारचा कारभार नाकारणार्या सर्व मतदारांचेही फडणवीस यांनी आभार मानले आहेत.
मविआ सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता-राहील.
भाजपाच्या 24 आणि सहयोगी मिळून सर्वाधिक 30 नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली.सदस्यसंख्येत सुद्धा सर्वाधिक 415 हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. pic.twitter.com/Sf4QcAIHNn— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 19, 2022
कितीही पक्ष एकत्र आले तरी जनतेचा मोदींवर विश्वास
कितीही पक्ष एकत्र आले तरी या देशातील जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्त्वावर विश्वास ठेवते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मोदींचे नेतृत्त्व आणि आपल्या कार्यकर्त्यांचे परिश्रम याचेच हे यश असल्याचे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा : Nagar Panchayat Election : नगरपंचायतीतही भाजपच नंबर १ ! महापालिकेतही पुरून उरणार- चंद्रकांत पाटील