घरताज्या घडामोडीओबीसी आरक्षणावरील भाजप दाखवत असलेले प्रेम हे 'पुतणा-मावशीचं प्रेम', नाना पटोलेंचा पलटवार

ओबीसी आरक्षणावरील भाजप दाखवत असलेले प्रेम हे ‘पुतणा-मावशीचं प्रेम’, नाना पटोलेंचा पलटवार

Subscribe

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर भाजपला आता आलेला कळवळा हा केवळ दिखावा आहे. ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीस केवळ आणि केवळ भाजप आणि देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. भाजपचा डीएनए ओबीसीविरोधी असून आता ओबीसी आरक्षणाबद्दल भाजप दाखवत असलेले प्रेम हे ‘पुतना मावशीचे प्रेम’ आहे,  असा जोरदार पलटवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केला.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपच्या बैठकीत ओबीसी आरक्षणावरून आघाडी सरकारवर टीका केली. या टीकेला पटोले यांनी उत्तर दिले. भाजप हाच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मारेकरी असल्याचा आरोप करताना ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यास काँग्रेस कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस आणि भाजप ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडत आहेत. दोन वर्षे काय केले असा प्रश्न विचारत आहेत. मग फडणवीस सरकारने पाच वर्षे काय केले? त्यांनी आयोग गठीत का केला नाही? इम्पिरिकल डेटामध्ये असंख्य चुका आहेत असा दावा करणाऱ्या फडणवीसांनी मोदी सरकारक़डे हा डेटा कशासाठी मागितला होता? आणि त्याच डेटाचा वापर मोदी सरकार सरकारी योजना राबवण्यासाठी का करत आहे?असे सवाल फडणवीस यांनी केले.

देशातील आरक्षण संपवणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा आज जो पेच निर्माण झाला आहे त्याची सुरुवात फडणवीस यांनीच केली. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार असताना २०१७ साली नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीवेळी फडणवीस यांनी ओबीसींचे रोश्टर क्लिअर करायचे म्हणून एक साधे परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या. हे प्रकरण न्यायालयात गेले, त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेसह इतर जिल्हा परिषदाही कोर्टात गेल्या. २०१८ साली उच्च न्यायालयाने सांगितले  की आयोग बसवा.परंतु तत्कालीन फडणवीस सरकारने त्यावर निर्णय घेतला नाही म्हणून ओबीसींचे आरक्षण गेले, असा दावा त्यांनी केला.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकार यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले. परंतु त्यासाठी आवश्यक असणारा ओबीसींचा डेटा देण्यास केंद्रातील मोदी सरकारनेही नकार देऊन महाराष्ट्र सरकारची कोंडी केली. मध्यप्रदेशमध्ये जेव्हा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा मात्र केंद्रातील मोदी सरकराने त्या सरकारला मदत करण्याची भूमिका घेतली. महाराष्ट्रात भाजपविरोधी सरकार असल्याने केंद्राने मदत केली नाही, असा आरोप नाना पटोले यांनी केला.


हेही वाचा : …पण १४ तारखेला अनेकांचा मास्क काढणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -