घरताज्या घडामोडीराफेल करारात करोडो रुपयांची दलाली कोणी खाल्ली?, नाना पटोलेंचा अमित शाहांना सवाल

राफेल करारात करोडो रुपयांची दलाली कोणी खाल्ली?, नाना पटोलेंचा अमित शाहांना सवाल

Subscribe

देशातील सर्वात मोठा डिलर व ब्रोकरचे काम करणाऱ्या भारतीय जनात पक्षाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवर आरोप करणे हेच हास्यास्पद आहे. राफेलमधील दलाली, नोटबंदीमध्ये जुन्या नोटा बदलून देण्याच्या मोबदल्यात कोणत्या पक्षाच्या लोकांनी करोडो रुपयांची दलाली खाल्ली हे देशाच्या जनतेला माहित आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लगावला आहे.

डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही योजना १ जानेवारी २०१३ रोजी काँग्रेस प्रणित युपीए सरकारने सुरु केली. त्याचे श्रेयही अमित शहा भाजपाला देत आहेत हे दुर्दैवी आहे. काँग्रसेच्या चांगल्या योजना स्वत:च्या नावावर खपवून बिनधास्तपणे खोटे बोलणे ही भाजपची पद्धत आहे. परंतु त्या योजनेला डिलर , ब्रोकर , ट्रान्सफर अशा उपमा देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर टीका करणारा भारतीय जनता पक्षच खऱ्या अर्थाने या देशातील सर्वात मोठा डिलर आणि ब्रोकर आहे. असं नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

राफेल करारात करोडो रुपयांची दलाली कोणी खाल्ली? नोटबंदीमध्ये नोटा बदलण्याच्या कामात कोणत्या पक्षाच्या लोकांनी भरमसाठ दलाली केली? देशातील सार्वजनिक बँका, विमानसेवा, विमानतळ, रेल्वे, रस्ते, विमा कंपनी हे खाजगी उद्योगपतींच्या घशात घालण्याच्या ‘डिल’ कोणी केल्या आणि त्यासाठी ‘ब्रोकर’चे काम करत कोणी पैसे खाल्ले हे जनतेला माहित आहे.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राजीनामा देऊन निवडणुका घ्यावात. अमित शहांचे वक्तव्य चुकीचे असून त्यांनी लोकशाहीचा सन्मान करायला शिकलं पाहीजे. सुत्तेच्या गुर्मीत असणारेच अशा प्रकारची वक्तव करतात. असं पटोलेंनी म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारसोबतच केंद्रातील भाजपा सरकारही बरखास्त करा आणि निवडणुका घ्या. भाजपाविरोधात देशातील जनतेत किती असंतोष आहे. हे तुम्हाला कळेल, असं आव्हान देखील नाना पटोलेंनी दिलं आहे.

- Advertisement -

कोरोनाकाळात लाखो हिंदू लोकांचाही जीव गेला त्यावेळी हिंदुत्वाचे हे ठेकेदार काय करत होते? कोरोना महामाहारीच्या संकटात पीएम मोदी गायब होते. ते फक्त टिव्हीवरच दिसायचे. शेतकरी १४ महिने दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होता. त्यामुळे पीएम मोदी शेतकऱ्यांना भेटताना दिसले नाहीत, ते कुठे होते, असा देखील सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे.


हेही वाचा : Omicron Variant : भारतात पुढील काही महिन्यांत ओमिक्रॉनचा धोका वाढण्याची शक्यता, AIIMS च्या डॉक्टरांचे संकेत


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -