घरमहाराष्ट्रओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका नकोत; नाना पटोले यांची भूमिका

ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका नकोत; नाना पटोले यांची भूमिका

Subscribe

ओबीसी आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ नयेत हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकले पाहिजे यासाठी सर्वपक्षीय बैठक झाली होती. या बैठकीतच आरक्षण टिकावे यावर चर्चा होऊन ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण ठेऊन निवडणुका घ्याव्यात आणि त्याबाबतचा अध्यादेश काढण्याचा निर्णय झाला. या अध्यादेशाला आगामी अधिवेशनात कायद्याचे स्वरुप द्यावे असा निर्णय झाला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अध्यदेशाला स्थगिती दिली आहे. यावरील पुढील सुनावणी १३ तारखेला होत असून त्यावेळी राज्य सरकार आपली भूमिका मांडेल आणि त्यातून निश्चित मार्ग निघेल, असा विश्वासही पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

- Advertisement -

ओबीसींच्या आरक्षणाचा गुंता तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमुळेच वाढला आहे. भाजपची याबद्दलची दुट्टपी भूमिका आहे. एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समान नागरी कायद्यासाठी आग्रही आहे. तर दुसरीकडे भाजप ओबीसींच्या आरक्षणासाठी लढत आहे, असे दाखवून लोकांची दिशाभूल करत आहे. भाजप आणि आरएसएस यांचा अजेंडाच मूळात आरक्षण संपवण्याचा आहे,असा आरोप पटोले यांनी लागवला.

आरएसएसची आरक्षणाबद्दलची भूमिका आधी भाजपने स्पष्ट करावी आणि मग आंदोलनाबदद्ल त्यांनी बोलावे. त्यांचा छुपा अजेंडा सर्वांना माहित आहे. त्यांचा खरा चेहरा समोर आला पाहिजे. भाजप बहुजनांची दिशाभूल करत आहे. काँग्रेस सुरुवातीपासूनच आरक्षणाच्या बाजूने आहे आणि ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत हीच काँग्रेसची भूमिका आहे, असे पटोले म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -