घरताज्या घडामोडीकोरोना, वादळ, पाऊस मुख्यमंत्र्यांच्या पायगुणामुळेच, पांढरे पाय आहेत का? बघितलं पाहिजे -...

कोरोना, वादळ, पाऊस मुख्यमंत्र्यांच्या पायगुणामुळेच, पांढरे पाय आहेत का? बघितलं पाहिजे – नारायण राणे

Subscribe

सध्याच्या परिस्थितीला स्थानिक प्रशासन जबाबदार

राज्यात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीचा आणि दरडग्रस्त भागाचा राजकीय नेते मंडळी दौरे करत आहेत. या दौऱ्यादरम्यान नागरिकांना मदतीचं आश्वासन आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे चिपळूणमधील पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. यावेळी राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तर चिपळूणमधील व्यापारी आणि नागरिकांना केंद्र सरकारकडून मदत मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिलं आहे. मुख्यमंत्री पांढऱ्या पायाचे आहेत का पाहायला पाहिजे. आल्यापासून कोरोना वादळ आणि पाऊस संकट येत असल्याची टीका नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी नारायण राणे यांना राज्यात मागील दोन वर्षांपासून सतत संकट येत आहेत असा प्रश्न करण्यात आला होता यावर राणेंनी उत्तर दिलं आहे. राज्यातील भयावह परिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार आहे. याला कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पायगुण आहे. आल्यापासून वादळ, पाऊस सर्व सुरु आहे. कोरोना त्यांची देण असल्याचा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊन आले पाय बघायला पाहिजे, पांढऱ्या पायाचा अशी खोचक टीका नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, सर्वोतोपरी मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन


परिस्थितीला स्थानिक प्रशासन जबाबदार

राज्यात मुख्यमंत्री नाही, प्रशासन नाही अशी भयावह परिस्थिती आहे. पाठांतर करुन यायचे आणि लोकांमध्ये बोलायच अशी टीका राणे यांनी केली आहे. मागील चार दिवसांपासून लोक अधिकाऱ्यांना जाब विचारत होते. काही कल्पना लोकांना देण्यात आली नाही. धोका लक्षात घेऊन लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करायला हव होत. राज्य सरकारने तातडीने पावलं उचलण्याची गरज होती. या सर्व परिस्थितीला प्रशासन जबाबदार आहे.

- Advertisement -

राज्य चालवायला द्या आम्ही वेटींगवर बसलोय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उठसूठ केंद्राकडे मदतीचा हात पसरवतात यावर नारायण राणे यांनी टीका केली आहे. राज्य चालवायला आमच्या हाती द्या, आम्ही वेटींगवर बसलो आहे. केंद्र सरकार सातत्याने मदत करत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत कबुली दिली आहे. आज मुख्यमंत्री विनम्र झाले आहेत. अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.


हेही वाच : आमच्या दौऱ्याच्या माहितीमुळे मुख्यमंत्र्यांनी चिपळूण दौरा केला, नारायण राणेंचा आरोप


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -