घरमहाराष्ट्रशिंदे सरकारमधील बड्या नेत्याच्या मागणीकडे दुर्लक्ष; 1 फेब्रुवारीला बसणार उपोषणाला

शिंदे सरकारमधील बड्या नेत्याच्या मागणीकडे दुर्लक्ष; 1 फेब्रुवारीला बसणार उपोषणाला

Subscribe

माथाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वारंवार निवेदन देऊनही दुर्लक्ष होत असल्याने शिंदे सरकारमधील एका बड्या नेत्याने उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. माजी आमदार आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे 1 फेब्रुवारीला उपोषणाला बसणार आहे. मंत्री दर्जाबद्दल एकनाथ शिंदे यांनी अलीकडे घोषणा केली होती, मात्र नरेंद्र पाटील यांचं हे उपोषण सरकारला घरचा आहेर मानला जात आहे.

माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या कामगार, गृह, पणन-सहकार, नगरविकास, महसूल व अन्य खात्याअंतर्गत प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्र शासन व संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम माथाडी कामगारांचा निषेधार्थ 1 फेब्रुवारी 2023 रोजी नाईलाजास्तव लाक्षणिक संपाचा निर्णय घेतल्याचं नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी जाहीर केलं आहे.

- Advertisement -

राज्यातील माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची निवेदनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री, संबंधित विभागाचे प्रधान सचिव, कामगार आयुक्त, माथाडी बोर्ड व अन्य संबंधितांकडे दिलं होतं. यावर अनेकदा संयुक्त बैठका झाल्या, मात्र तरी अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. म्हणून संप, आंदोलने, मोर्चे, उपोषणे केली, परंतु माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न जैसे थेच आहेत, असं नरेंद्र पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले.

अलीकडेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप पुकारला असल्यासंबंधीचे नोटीस व प्रश्नांचे निवेदन सादर केले आहे. परंतु सरकारने याबाबत गांभिर्याने विचार केलेला नाही, असेही नरेंद्र पाटील म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्रात 36 माथाडी मंडळे आहेत, यात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात एकूण 11 माथाडी मंडळे आहेत. यात अन्य मंडळांच्या पुनर्रचना झालेल्या नाहीत, त्यामुळे माथाडी कामगारांचे धोरणात्मक प्रश्न प्रलंबित आहेत. सल्लागार समितीवर अनुभवी कामगार नेत्यांची नेमणुका करणं गरजेच आहे. यात माथाडी मंडळाना आता 50 वर्षे पूर्ण झाली, कार्यालयीन सेवेतील अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या माथाडी मंडळांमध्ये कर्मचारी नाहीत, त्यामुळे कामगारांची दैनंदिन काम होत नाहीत, माथाडी कामगारांच्या मुलांना माथाडी मंडळा्या सेवेत प्राधान्य द्यावे म्हणून सतत मागणी केली आहे. त्यावर कार्यवाही होत नाही, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांची शासन व संबंधितांकडून सोडवणूक केली जात नाही, त्यामुळे माथाडी कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. कामगारांना नाईलाजास्तव लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडलं जात आहे, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.


Union Budget 2023-24 : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -