म्हसरुळ परिसरातील पेठरोड येथील इंद्रप्रस्थनगरीत सैन्य दलातील एका जवानाने त्याच्या पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. पत्नी चैताली बावा (२३) हिचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार २६ फेब्रुवारी रोजी घडल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा – दिल्ली हिंसाचार : मृतांचा आकडा ३४ वर
नेमके काय घडले?
पेठरोड येथील इंद्रप्रस्थनगरीत सैन्य दलातील जवान सुनील बावा (३०) दहा दिवसांच्या सुट्टीसाठी घरी आला होता. त्या दरम्यान या दोघांमध्ये घरगुती वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, सुनीलने चैताली हिचा गळा आवळला. यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे. पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर त्याने चाकूने स्वत:च्या हातावर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपी सुनील बावा याच्याविरोधात म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – दिल्ली हिंसाचार दंगल नसून हल्ला – प्रकाश आंबेडकर