घरताज्या घडामोडी705 नागरीक उत्तर प्रदेशला रवाना

705 नागरीक उत्तर प्रदेशला रवाना

Subscribe

महापालिकेतर्फे विशेष रेल्वेने रवानगी; जेवनाच्या पाकिटांसह पाणीही पुरवले

नाशिक : शहरातील विविध भागातून उत्तर प्रदेशच्या 705 नागरिकांना त्यांच्या मूळगावी विशेष रेल्वेने पाठवण्यात आले आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाने विशेष रेल्वेसेवा उपलब्ध करून त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था केली. रेल्वे स्थानकावर या नागरिकांना नेण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व वाहनांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच रेल्वे तिकीट बुकिंग प्रशासनामार्फत करण्यात आले. तसेच रेल्वे स्थानकात व रेल्वे प्रवासात फिजिकल डिस्टन्स राहील या बाबत दक्षता घेण्यात आली. या सर्व नागरिकांना पाठवण्यापूर्वी मनपाचे वैद्यकीय पथकाने त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र दिले. या नागरिकांना गुरुवारी (दि.28) दुपारचे जेवण देण्यात आले. तसेच त्यांना प्रवासात पाणी बॉटल, सुके खाद्यपदार्थ अशा स्वरूपाचा नाष्टा सोबत देण्याची व्यवस्था उपायुक्त अर्चना तांबे यांनी केली. यावेळी मनपा शिक्षण समितीचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -