Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र व्यापाऱ्यांची मनमानी; देवळ्यात कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा रास्तारोको

व्यापाऱ्यांची मनमानी; देवळ्यात कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा रास्तारोको

Subscribe

नाशिक : देवळा बाजार समितीमध्ये परवानाधारक व्यापारी व नाफेड यांच्या कांदा खरेदीत बाजार भावात तफावत दिसून आल्याने परवानाधारक व्यापार्‍यांनी कांदा खरेदी काही काळ बंद ठेवल्याने संतप्त कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी रस्त्यावर उतरून व्यापार्‍यांच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करून आंदोलन केले.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मंगळवारी (दि. १२) सकाळी ११ वाजता देवळा बाजार समितीमध्ये खरेदीदार व्यापार्‍यांबरोबर नाफेडचे काही व्यापारी कांदा खरेदीसाठी उतरले असताना व्यापार्‍यांनी नाफेड ज्यादा भावाने खरेदी करतो म्हणून व्यापार्‍यांनी लिलाव बंद पाडला. याचा उद्रेक होऊन संतप्त शेतकर्‍यांनी बाजार समितीच्या आवारासमोर रास्ता रोको आंदोलन करून मनमानी कारभाराचा निषेद व्यक्त केला. यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष माणिक निकम यांनी कांद्याचे बाजारभाव पडले असून, नाफेडने कांदा खरेदीसाठी सुरुवातीपासून माल खरेदी करण्यासाठी लिलावात सहभागी होणे आवश्यक होते.

- Advertisement -

मध्यंतरी बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात असतांना नाफेडने शिरावर खरेदी करून शेतकर्‍यांची लूटमार केली आहे. आता अवाक कमी झाल्याने नाफेडने बाजारात उतरून कांदा खरेदीला सुरुवात केली आहे.  मात्र आता कांदा अल्प प्रमाणात शिल्लक असतांना व बाहेर कांद्याचे दर कमी असल्याने नाफेडच्या दरात व्यापारी कांदा खरेदी करू शकत नसल्याने तसेच शेतकर्‍यांना दोन पैसे जादा मिळत असतांना व्यापार्‍यांनी लिलाव बंद पाडून शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू केला आहे.

यावेळी बाजार समितीचे सभापती योगेश आहेर व तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी हस्तक्षेप करून व्यापार्‍यांच्या व शेतकर्‍यांच्या भावना लक्षात घेऊन लिलाव पूर्ववत करण्याची सूचना दिली. यानंतर लिलाव सुरु झाल्यावर व्यापार्‍यांनी २०० ते २५० रुपयांच्या घसरणीत कांदा खरेदी केला. मंगळवारी देवळा बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात कांद्याची जवळपास सात हजार क्विंटल इतकी आवक होऊन बाजारभाव कमीतकमी २५०, जास्तीतजास्त २१२५ तर सरासरी १९२५ असा होता. कांद्याच्या बाजारभावात दिवसेंदिवस सुरु असलेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी राज्य व केंद्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -