कंधाणे येथील ज्ञानेश्वर शिवणकर (वय ३२) या तरुण शेतकर्याने कांदा शेती तोट्यात गेल्याने शेतातील कांद्याच्या ढिगावर बसून विष प्राशन करुन आत्महत्या केली.तर नांदगाव (बु) येथील चेतन केदा बच्छाव ( वय. २३ ) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. तसेच सायने (खु.) येथील शेतकरी वसंत पाटील ( ४५ ) यांनी देखील विषप्राशन केल्याने शुक्रवारी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर, संगमनेरजवळ ट्रकवर कार आदळून झालेल्या अपघातात सांत्रस कुटुंबातील किशोरवयीन मुलगा व जावयी यांचा जागीच मृत्यू झाला, चारजण गंभीर जखमी झाले. तर, चांदवडमध्ये कंटेनरच्या धडकेत मोपेडवर चाललेल्या पती पत्नीसह मुलगा जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.