घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदेवळाली गावं राडा प्रकरण : ठाकरे गटाचे मानियार यांच्यावर खोटा गुन्हा, नेत्यांचे...

देवळाली गावं राडा प्रकरण : ठाकरे गटाचे मानियार यांच्यावर खोटा गुन्हा, नेत्यांचे ‘सीपी’ना निवेदन

Subscribe

नाशिक : देवळालीमध्ये १९ जानेवारी रोजी सार्वजनिक पारावर शिवजयंती बैठकीत झालेल्या राड्यात तक्रार करणारे माजी नगरसेवक भैय्या मणियार आणि त्यांच्या दोन सहकार्‍यांना तीन दिवसानंतर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत. यामागे पालकमंत्र्यांचा दबाव कारणीभूत असल्याचा दाट संशय आहे. मणियारसह दोघांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

१९ जानेवारीला देवळाली गाव येथील सार्वजनिक परावर झालेल्या सर्वपक्षीय शिवजयंती समितीच्या बैठकीत माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्याकडे मागील वर्षाचा हिशेब मागितला असता त्याचा राग येऊन लवटे यांनी माजी नगरसेवक भैय्या मणियार व त्यांच्या कार्यकर्त्यांशी नाहक वाद घातला व शिवीगाळ केली. यावेळी स्वप्निल लवटे यांनी गोळीबार करीत जीवे मारण्याची धमकीही दिली. लवटे व त्यांच्या साथीदारांकडे घातक शस्त्रेही होती. या सर्व घटनेची सत्य माहिती उपनगर पोलिसांनी घेतली व नंतर स्वप्निल लवटेला अटकही केली.

- Advertisement -

या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. तरीही, या घटनेच्या तीन दिवसानंतर पोलिसांनी ज्यांनी तक्रार केली ते भैय्या मणियार, प्रशांत जाधव आणि सागर कोकणे यांच्यावर खोटे आरोप करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचे हे कृत्य निषेधार्ह आहे. कोणतेही पुरावे नसताना पालकमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस सर्व उद्योग करीत असल्याचा दाट संशय आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठांनी चौकशी करावी आणि मणियार, जाधव, कोकणे यांच्याविरुद्धचे खोटे गुन्हे मागे घ्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी माजीमंत्री बबनराव घोलप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार योगेश घोलप, आमदार विलास पोतनीस, माजी गटनेते विलास शिंदे, राहुल ताजनपुरे आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -